शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 3:08 PM

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं.

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही संकटांचा डोंगर येथील पूरपीडित नागरिकांसमोर उभा आहे. पंचगंगा, कोयना आणि कृष्णा नदीच्या महापुरात हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली गेले होते. तर, नाशिक, सातारा आणि कोकणातील काही भागांनाही पूराचा सामना सहन करावा लागला. या पूरस्थितीत स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, कोस्टल गार्ड आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन हजारो जीव वाचवले असून लाखोंना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे. 

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली. तर, केवळ भारतीय वायू दलाने 14,000 नागरिकांना एअरलिफ्ट करत त्यांचा जीव वाचवला आहे. 

महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक राज्यातही गेल्या 7 दिवसांपासून पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पूरस्थितीतून भारतीय नौदलाने तब्बल 14000 नागरिकांना एअरलिफ्ट करुन आणि बोटींच्या त्यांचा जीव वाचवला. वर्षा राहत या ऑपरेशन अंतर्गत वायू दलाची 41 पथके विविध राज्यातील पूरग्रस्त भागात कार्यरत होती. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने ही पथके आपलं कर्तव्य बजावत होती. गेल्या 30 वर्षातील हे सर्वात मोठे ऐतिहासिका बचाव कार्य असल्याचे वायू दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. नौदलाच्या पथकांकडून महाराष्ट्र आणि गोव्यातून तब्बल 11,124 लोकांना वाचविण्यात आले आहे. नौदलाच्या हेलिकॉप्टरने 1890 किलो वजनाचे बचाव आणि मदत साहित्य महाराष्ट्रात पुरवले असून कर्नाटकमध्ये 1305 किलो सामान देण्यात आलं आहे. 

दरम्यान, स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल 3,  तसेच नौदलाच्या 18, तटरक्षक दलाचे 8, आर्मी 17, उपलब्ध बोटी 163  अशी पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत कोल्हापूर येथील 3 लाख 36 हजार 297 तर सांगली येथील 1 लाख 74 हजार 485 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरindian navyभारतीय नौदल