शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Mrityu Kup: संभलमध्ये खोदकामावेळी आढळला मृत्यू कूप; काय आहे धार्मिक महत्त्व?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:28 IST

Mrityu Kup in Sambhal : हनुमान मंदिर आणि शिव मंदिर आढळून आल्यानंतर संभलमध्ये खोदकाम सुरू असून, जमिनीखाली गाडल्या गेलेली अनेक जुनी मंदिर आणि धार्मिक अवशेष आढळून येत आहे. 

Sambhal Latest News: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल बातम्या आणि चर्चेचा विषय ठरत आहे. संभलमध्ये सुरू असलेल्या खोदकामात मंदिरं, जुन्या विहिरी आढळून आल्या आहेत. गुरुवारी संभलमध्ये मृत्यू कूप सापडला. तिथे बाजूला शिव मंदिर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रशासनाने या मृत्यू कूप खोदण्यास आणि जिर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. 

शाही जामा मशीद सर्व्हेक्षण मुद्द्यावरून संभल चर्चेमध्ये आले. त्यानंतर प्रशासनाने येथे पाहणी आणि खोदकाम सुरू केले आहे. आतापर्यंत काही मंदिरं, विहिरी आणि बारव सापडले आहेत. गुरूवारी प्रशासनाला एक कूप सापडला. हा मृत्यू कूप असल्याचे सांगण्यात आले. 

उत्तर प्रदेशातील संभल प्राचीन काळात तीर्थांचे केंद्र होते. याचा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. पौराणिक कथांनुसार, संभलमध्ये ८४ कोसी नदी परिक्रमा मार्ग, ६८ तीर्थ आणि १९ कूप अस्तित्वात होते. त्याचे धार्मिक महत्त्व होते. 

बदलत्या काळात येथून हिंदूंचे स्थलांतर होत गेले. त्यामुळे मंदिरं ओसाड पडली आणि विहिरी बारव मातीने बुजली गेली. आजघडीला संभलमध्ये ३ तीर्थ अस्तित्वात आहेत, ज्याची परिक्रमा आणि दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येतात. अशा पौराणिक कथा आहेत की, पंच कोसी यात्रा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

मृत्यू कूपचे धार्मिक महत्त्व काय?

संभलमधील मृत्यू कूपबद्दल काही पौराणिक कथा आहे. या कथांमध्ये असे म्हटले गेले आहे की, येथे स्नान केल्याने मोक्ष मिळतो. या भागाचे नगरसेवक गगन वाष्णेय यांनी सांगितले की, 'आज संभलमध्ये ऐतिहासिक मृत्यू कूपचे खोदकाम सुरू झाले आहे. हा प्राचीन कूप आहे. हे खोदकाम नगरपालिकेच्या मदतीने सुरू आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की, इथे स्नान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो.' 

संभलमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या तीन तीर्थ कोणती?

संभलपासून तीन ते चार किमी अंतरावर वंशगोपाल मंदिर आहे आहे. ते बेनीपूर कमलपूर गावात आहे. हे मंदिर श्रीकृष्णाचे असून, प्राचीन काळापासून पंचक्रोशी परिक्रमा या मंदिरापासून सुरू होते. या परिक्रमेत संभलशिवाय इतर ठिकाणचे लोकही सहभागी होतात. इथे पूजा केल्याने अपत्य प्राप्ती होते, असे म्हणतात. 

तीन तीर्थांपैकीच दुसरे आहे सूर्यकुंड तीर्थ. याला अर्ककुंड तीर्थ म्हणून ओळखले जाते. २४ कोसी परिक्रमा करण्यासाठी लोक येतात. दिवाळीनंतर दोन दिवसांनी ही परिक्रमा सुरू होते. येथे यात्राही भरते. येथे स्नान केल्याने पाप धुतले जातात, अशी पौराणिक मान्यता आहे.

मृत्युजंय तीर्थ हे संभलमधील हयातनगरमध्ये आहे. इथे पूजा, स्नान केल्यानं अकाली मृत्यू होत नाही, असे म्हणतात. त्याचबरोबर येथे स्नान करणाऱ्यांना लोकांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते, अशाही कथा आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशReligious Placesधार्मिक स्थळेArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणhistoryइतिहास