शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मिस्टर इंडिया मैदान सोडून गेले - संघाचा राहुल गांधींना चिमटा

By admin | Updated: September 27, 2015 14:05 IST

ष्ठांच्या पक्षातील तरुण 'मिस्टर इंडिया' नेहमीप्रमाणे कोणताही सुगावा न लागू देता निवडणुकीच्या मैदानातून गायब झाले आहेत अशा शब्दात संघाने राहुल गांधींना चिमटा काढला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - ज्येष्ठांच्या पक्षातील तरुण 'मिस्टर इंडिया' नेहमीप्रमाणे कोणताही सुगावा न लागू देता निवडणुकीच्या मैदानातून गायब झाले आहेत अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवस संघाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. युवराज मैदान सोडून गेल्याने पक्षाची जबाबदारी पुन्हा एकदा ज्येष्ठांच्या खांद्यावर आल्याचा चिमटाही संघाने काढला आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्यच्या संपादकीयमधून रविवारी राहुल गांधींवर बिहार निवडणुकीवरुन जोरदार टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या अमेरिकेत असून यावरुन संपादकीयमध्ये भाष्य करण्यात आले आहे. 'धोती व सुटवरुन वारंवार विधान करणारे युवराज आता परतले आहेत. बिहारमध्ये फक्त ४१ जागांवर लढणारा सर्वात जुना पक्षाची ही ऐतिहासिक नाचक्की आहे' असे यात म्हटले आहे. रणसंग्रामापूर्वी मैदातान उडालेल्या धुळीमुळे युवराज थकले आहेत असा चिमटाही या लेखात काढण्यात आला आहे. अनिल कपूर यांचा मिस्टर इंडिया चित्रपट गाजला होता. या चित्रपटातील नायक अदृश्य व्हायचा. त्याच धर्तीवर संघाने राहुल गांधीना 'मिस्टर इंडिया' असे संबोधित केल्याने आता काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरही संघाच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे.