शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

उत्तर प्रदेशात परतलेल्या स्थलांतरित कुटुंबाचे अन्नधान्यासाठी हाल, पोट भरण्यासाठी विकावे लागले दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 5:24 PM

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांनी हजारो किलोमीटरचा पल्ला मिळेल त्या साधनाने वा पायी पार करत आपले मूळ गाव गाठले आहे. मात्र गावी गेल्यानंतरही अशा स्थलांतरितांची फरफट थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

कन्नौज (उत्तर प्रदेश) - देशात झालेला कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर फरफट झाली आहे. हजारो मजुरांनी हजारो किलोमीटरचा पल्ला मिळेल त्या साधनाने वा पायी पार करत आपले मूळ गाव गाठले आहे. मात्र गावी गेल्यानंतरही अशा स्थलांतरितांची फरफट थांबण्याचे नाव घेत नाही आहे.उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या अशाच एका कुटुंबाकडे खाण्यासाठीसुद्धा काही नव्हते. त्यामुळे या कुटुंबाला धान्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी स्वतःकडचे दागिने नाईलाजास्तव विकावे लागल्याची घटना समोर आली आहे. हे कुटुंब सुमारे तीस वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये गेले होते. तिथे कुल्फी विकून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने या कुटुंबाला मुळगावी परतावे लागले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कन्नौजमधील फतेहपूर जसोदा गावातील रहिवासी असलेले श्रीराम तीस वर्षांपूर्वी कुटुंबासह तामिळनाडूमध्ये गेले होते. तिथे कुल्फी विकून ते उदरनिर्वाह करत होते. तसेच ते पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घरमालकाने त्यांना घर खाली करण्यास बजावले त्यानंतर ते गावी परतले.मात्र गावी परतल्यानंतर त्यांचा पुढच्या फरफटीस सुरुवात झाली. याबाबत श्रीराम यांची कन्या राजकुमारी हिने सांगितले की, येथे आल्यावर आम्हाला १० किलो तांदूळ आणि डाळ देण्यात आली. आमचे कुटुंब मोठे आहे. त्यामुळे आमच्याकडील धान्य लवकर संपले. तर माझी भावंडे आणि आई आजारी पडली. त्यामुळे धान्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी आईकडील काही दागिने विकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. यादरम्यान आम्ही रेशनकार्ड बनवण्यासाठी प्रयत्न देखील केला. मात्र नवीन रेशनकार्ड बनत नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले.दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रशासन खडबडून जागे झाले. कन्नौजचे जिल्हाधिकारी राजेश मिश्रा यांनी याबाबत सांगितले की, मी ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी आणि सप्लाय इन्स्पेक्टर यांना याबाबतचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हे कुटुंब दोन आठवड्यांपूर्वी परतले होते. तसेच ट्रांझिस्ट कँम्पमध्ये राहत होते. त्यांची नोंदणी करून त्यांना धान्य देण्यात आले आहे. तसेच त्यांचे जॉब कार्ड बनवण्यात आले असून, त्यांचे रेशनकार्डही बनवण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत