शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 11:32 IST

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली.

ठळक मुद्देपरालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली. शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं.तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो.

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली आहे. हा प्रयोग तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सहज शक्य आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यासाठी शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं आहे. 

'हा प्रयोग केला तर यातून रोजगार उत्पन्न होईल व शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्नही मिळेल. त्यासोबतच दरवर्षीची प्रदूषणाची समस्याही मार्गी लागेल. मात्र त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. परालीपासून सीएनजी तयार करण्यावर यापूर्वीही विचार झालेला आहे. त्यावर कामदेखील सुरू आहे. परालीपासून सीएनजीची निर्मिती करणारा प्रकल्प करनाल येथे उभारण्यात येणार असल्याची चर्चाही गेल्या महिन्यात पुढे आली होती. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर हा यासाठी करण्यात येणार आहे. 

तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो. त्यासाठी बारा ट्रॅक्टर सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहेत. सीएनजीवर चालणारे हे देशातील पहिलेच ट्रॅक्टर असतील. असाही दावा यासोबत करण्यात आला आहे. हा प्रकल्प ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे प्रमुख अजय बंसल यांच्या वतीने विविध कंपन्यांच्या सहभागाने उभारण्यात येत आहे. पुढच्या वर्षी मे मध्ये प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पामुळे आसपासच्या 15 गावांमध्ये शेतात पराली जाळण्याचा प्रकार बंद होईल.

दररोज 10 हजार किलो सीएनजी

एका प्रकल्पाच्या ठिकाणी शंभर टन परालीपासून तयार झालेल्या पावडरने दहा हजार झालेल्या पावडरने दहा हजार किलो सीएनजीचे उत्पादन केले जाईल. ज्यांच्या शेतातील पराली वापरण्यात आली आहे त्यांना स्वस्त दरात सीएनजी विकण्यात येईल. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. दिल्लीतील प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम असेल तर सम दिवसांना रस्त्यावर फिरण्याची अनुमती असेल. तसेच विषम आकड्यांसाठी लागू असेल. रविवार वगळता दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. यातून दुचाकींना सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, स्कूल बस, महिला यांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय व्हीआयपींनाही या नियमातून वगळण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi pollutionदिल्ली प्रदूषणair pollutionवायू प्रदूषणdelhiदिल्ली