शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 23:32 IST

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे. हे विमान मुंबईला जाण्यासाठी हैदराबादहून उड्डाण करण्याच्या तयारीत होते, तेव्हाच त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला. पायलटने तात्काळ विमान धावपट्टीवरच थांबवले आणि उड्डाण रद्द केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्याच एका विमानाचा मोठा अपघात झाला होता, ज्यात अनेक लोकांचा बळी गेला होता.

पायलटने टेकऑफ रद्द केलेमिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद विमानतळावर विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच ते थांबवण्यात आले. पायलटने शेवटच्या काही मिनिटांत विमान थांबवले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने टेकऑफ रद्द केले. यामुळे संभाव्य धोका टळला आणि विमानात असलेले सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली आणि त्या विमानाने प्रवाशांना मुंबईला पाठवण्यात आले.

अहमदाबादमध्ये घडला होता भीषण अपघातगेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली होती. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट AI-१७१ दुर्घटनाग्रस्त झाले होते. प्राथमिक अहवालानुसार, विमानाचे दोन्ही इंजिन निकामी झाले होते. यामुळे उड्डाण भरल्याच्या काही मिनिटांतच विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या एका इमारतीला धडकले. या विमानात एकूण २४२ लोक होते, त्यापैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचे विमान बी.जे. मेडिकल कॉलेजवर आदळल्याने तेथील २२ लोकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.

स्फोटासह लागली होती आगएअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमानाने १२ जून रोजी दुपारी लंडनसाठी उड्डाण केले होते. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून या विमानाने टेकऑफ केले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळावर उतरणार होते. परंतु, 'टेकऑफ' केल्यानंतर अवघ्या एका मिनिटातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाला सात हजार किलोमीटरचे अंतर कापायचे असल्याने त्यात एक लाख लिटर इंधन होते. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि इंधनाला आग लागली. आग इतकी भीषण होती की प्रवाशांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTelanganaतेलंगणा