शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 22:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर लोकसभेत मंगळवारपासून प्लॅस्टिकचे साहित्य वापरता येणार नसल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. 

तसेच लोकसभा सचिवालयाने प्लॅस्टिक बॉटल आणि अन्य प्लॅस्टिक साहित्याच्या वापरावर बंदी घालण्याबाबत अंमलबजावणी केली. संसदेतील सर्व विभाग आणि कर्मचा-यांना पर्यावरण पुरक साहित्य आणि पिशवी वापरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २ ऑक्टोबर पासून सर्व सरकारी कार्यालयात प्लॅस्टिक बंदी सक्तीची असणार आहे. 

लोकसभा सचिवालयानं आज लोकसभेत नॉन-फंक्शनल प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यास आजपासून बंदी घातली आहे. लोकसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना आणि संसद भवन संकुलात कार्यरत असलेल्या इतर सहाय्यक एजन्सींना सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच प्लॅस्टिक वस्तूऐवजी पर्यावरणास अनुकूल आणि नैसर्गिक कचर्‍याच्या पिशव्या वापरण्याचे आदेश देण्यात आले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करतांना 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशातील जनतेला प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यास सांगितले. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा