शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : "माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 08:33 IST

Lok Sabha Election Result 2024 And Adhir Ranjan Chowdhury : बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली.

Lok Sabha Election Result 2024 : पश्चिम बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली आहे. माझे राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही, असं म्हटलं आहे. एका बंगाली टीव्ही चॅनलशी बोलताना अधीर रंजन म्हणाले की, कठीण काळ येणार असल्याची भीतीही त्यांना वाटते. ते म्हणाले की, या सरकारशी (टीएमसी) लढण्याच्या प्रयत्नात मी माझ्या उत्पन्नाच्या स्त्रोताकडे दुर्लक्ष केलं आहे. मी स्वतःला बीपीएल खासदार म्हणवतो. राजकारणाशिवाय माझ्याकडे दुसरं कौशल्य नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत माझ्यासाठी अडचणी येणार आहेत आणि त्यावर मात कशी करावी हे मला माहीत नाही.

बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार युसूफ पठाण विजयी झाले आहेत, तर अधीर रंजन चौधरी यांचा ८५०२२ मतांनी पराभव झाला आहे. युसूफ पठाण यांना ५२४५१६ तर अधीर रंजन यांना ४३९४९४ मतं मिळाली. अधीर रंजन चौधरी यांच्या पराभवामुळे बंगालमधील काँग्रेसच्या शेवटच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेल्या बहरमपूरवरील काँग्रेसची राजकीय पकड संपुष्टात आली आहे. बंगालमधील मालदा दक्षिणेतील केवळ एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधरी म्हणाले की, "ते लवकरच त्यांचे खासदार निवास रिकामं करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. माझी मुलगी सध्या शिक्षण घेत आहे आणि कधी-कधी दिल्लीला अभ्यासासाठी जाते. मला तिथे नवीन घर शोधावं लागेल, कारण माझ्याकडे एकही घर नाही."

निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींच्या इंडिया ब्लॉकशी जवळीक साधताना, चौधरी म्हणाले की, त्यांनी विरोधी व्यासपीठावर टीएमसीच्या उपस्थितीवर कधीही आक्षेप घेतला नाही, परंतु त्यांनी बॅनर्जींसोबतच्या युतीला विरोध करून पक्षाची हानी केली आहे हे त्यांनी मान्य केलं. राज्य पीसीसी प्रमुखपदावर कायम राहणार का, असे विचारले असता अधीर रंजन म्हणाले की, मी निवडणुकीत माझा पराभव स्वीकारला आहे. मला माझे पद सोडायचे होते, माझ्या नेत्यांना या पदासाठी माझ्यापेक्षा योग्य कोणीतरी शोधण्याची विनंती केली, परंतु सोनिया गांधींच्या विनंतीवरून मी हा निर्णय मागे घेतला आहे. माझ्या नेत्यांचा मला अद्याप कोणताही फोन आलेला नाही. एकदा मला फोन आला की मी माझ्या पक्षाला माझी इच्छा पुन्हा सांगेन.

अधीर रंजन म्हणाले की, बहरामपूरमध्ये प्रचारासाठी कोणत्याही नेत्याला न पाठवण्याचा पक्षाचा निर्णय आहे आणि यासंदर्भात त्यांचे कोणतेही भाष्य नाही. ते म्हणाले की, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुर्शिदाबादला पोहोचली तेव्हा आम्ही त्यात सहभागी झालो. आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकदा मालदामध्ये प्रचार करत होते, पण बहारमपूरला कधीच आले नाहीत. हा आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय होता, ज्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेस