शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Lok Sabha Election 2019: राज्यसभा सदस्यांना भाजपाचे तिकीट?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:37 AM

सात मंत्र्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : सात केंद्रीय मंत्र्यांसह सुमारे एक डझन राज्यसभा सदस्यांना भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा विचार करीत असल्याचे सूत्रांकडून कळते. हे सदस्य लोकसभेवर निवडून आल्यास त्यांच्या रिकाम्या होणाऱ्या राज्यसभेच्या जागा सहजपणे पुन्हा जिंकता येतील एवढे पुरेसे संख्याबळ ज्या राज्य विधानसभांमध्ये आहे त्याच राज्यसभा सदस्यांच्या विचार सुरु आहे.२५ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १२ राज्यसभेवर आहेत. त्यापैकी स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, थावरचंद गेहलोत, जे. पी. नड्डा, रवी शंकर प्रसाद, चौधरी बिरेंद्र सिंग व मुख्तार अब्बास नक्वी या ७ जणांना लोकसभेवर पाठविण्याची शक्यता आहे. धमेंद्र प्रधान पेट्रोलियममंत्री झाल्यापासून भाजपाचा ओडिशातील चेहरा ठरले. २००९ च्या निवडणुकीत ते ओडिशामधील देवघर मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते. पुनर्रचनेनंतर तो मतदारसंघ राहिला नाही त्यामुळे नंतर त्यांना राज्यसभेवर निवडून आणले गेले. आता ओडिशातील त्यांचे राजकीय वजन वाढल्याने त्यांना यावेळी त्या राज्यातील अन्य एखाद्या मतदारसंघातून उभे केले जाऊ शकते.सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत हे मध्य प्रदेशमधीलभाजपाचे अनुसूचित जातींमधीलएक वजनदार नेते मानले जातात.२०१२ च्या आधी ते त्या राज्यातील शाजानपूर राखीव मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. नंतर त्यांना राज्यसभेत पाठविले गेले. त्यांना पुन्हा लोकसभेत आणले जाऊ शकते.आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी गेली लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. परंतु नेते शांताकुमार उभे राहिले नाहीत तर हिमाचल प्रदेशातील कांगडा मतदारसंघातून नड्डा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना बिहारमधील पाटणासाहेबमधून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. तेथून निवडून आलेले सध्याचे लोकसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा बंडखोर वृत्तीमुळे पक्षात असून नसल्यासारखे असल्याने यावेळी त्यांना तिकिट न देता त्यांच्याजागी प्रसाद यांना पक्ष उमेदवारी देऊ शकतो.अल्पसंख्य व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उत्तर प्रदेशातील रामपूरमधून उभे केले जाण्याची शक्यता आहे. पूर्वी १९९८ मध्ये नक्वी तेथून लोकसभेवर निवडून गेले होते. दिल्लीमध्ये केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांच्याऐवजी विजय गोयल यांना चांदणी चौकमधून उभे करून हर्षवर्धन यांना पूर्व दिल्लीमधून महेश गिरी यांच्याजागी उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.स्मृती इराणी अमेठीमधून?वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांना याहीवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीमधून उभे केले जाणार असल्याचे कळते. गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इराणी राज्यसभेवर निवडून आल्या तरी त्यांनी अमेठीमध्ये येऊन जनसंपर्क सुरूच ठेवला. इराणी भले निवडणूक हरल्या असतील, पण त्यांनी अमेठीच्या मतदारांची मने जिंकली आहेत, अशी पावती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अलीकडे तेथील एका कार्यक्रमात दिली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSmriti Iraniस्मृती इराणी