शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आम्हालाही 'अच्छे दिन' येऊ द्या!

By admin | Updated: December 29, 2015 08:52 IST

नानाविध कारणांनी प्रसारमाध्यमांतून टिका-टिप्पणीची संवय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्याच परिवारातील कुरबुरींमुळे वाईट प्रसिद्धीला तोंड द्यावे लागणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २९ - नानाविध कारणांनी प्रसारमाध्यमांतून होणार्‍या टिका-टिप्पणीची संवय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्याच परिवारातील कुरबुरींमुळे वाईट प्रसिद्धीला तोंड द्यावे लागणार आहे. संघाच्या 'ऑर्गनायझर' आणि 'पान्चजन्य' या दोन मुखपत्रांमधील कर्मचार्‍यांनी पगार आणि कार्यालयीन कामाच्या बाबतीत होत असलेल्या अन्यायाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून 'आम्हालाही अच्छे दिन येऊ द्या की', असे साकडे घातले आहे.
संघाच्या या इंग्रजी आणि हिंदी मुखपत्रांचे प्रकाशन 'भारत प्रकाशन (दिल्ली) लि.' या संघ परिवारातील कंपनीकडून केले जाते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्यानंतर या कंपनीच्या व्यवस्थापनातही बदल झाले व व्यवस्थापकीय संचालक परमानंद मोहरिया यांच्या धुरिधत्वाने कंपनीचा कारभार सुरु झाला. 
या नव्या व्यवस्थापनाने अन्याय्य आणि पक्षपाती धोरण स्वीकारल्याने या प्रशासन संस्थेतील वातावरण कलुषित झाले असल्याने भागवत यांनी यात लक्ष घालावे, अशी विनंती या मुखपत्रांच्या कर्मचार्‍यांनी केली आहे. २0 कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या असलेले हिंदीतील हे पत्र भागवत यांना २ डिसेंबर रोजी लहिले गेले आहे.
पत्रात हे कर्मचारी भागवत यांना लिहितात: नवी वेतनश्रेणी लागू करताना डावे-उजवे केले गेले, अनुभवी लोकांना निकम्मे ठरवून सक्तीने नवृत्त केले गेले, असलेले वेतन नीटपणे न देता लठ्ठ पगारांवर काही नवे लोक आणले गेले, अशी तक्रार करत या पत्रात चार कर्मचार्‍यांवर कसा अन्याय केला गेला याची उदाहरणेही दिली आहेत.
एरवी घरची धुणी चव्हाट्यावर धुण्याची संघाची संस्कृती नाही. शिवाय सूडाने कारवाई होण्याच्या भीतीने जाहीर बभ्रा न करता किंवा न्यायालयात न जाता एक कुटुंबप्रमुख या नात्याने या कर्मचार्‍यांनी प्राप्त परिस्थिती भागवत यांच्या कानावर घातली आहे.
अती झाले तर नाईलाजाने कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल, असे लिहिताना हे कर्मचारी पत्रात म्हणतात: घरात कशाची कमतरता असेल तर कुटुंबातील सर्व जण आहे त्यात भागवून घेतात. आम्हीही याच कौटुंबिक भावनेने कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तेव्हा तुटपुंजा पगारही प्रसंगी हप्त्याने घेतला व पगारवाढीसाठी कधी कुरकूर केली नाही. परिस्थितीची जाण ठेवून आम्ही संतुष्ट होतो व समाधानीही होतो. पण आता परिस्थिती तशी नाही. कंपनी नफ्यात आहे.या पत्राची प्रत सरकार्यवाह भैय्याजी जोशी, चार सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाळ, भागय्या व सुरेश सोनी यांच्याखेरीज अ.भा. प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनाही पाठविण्यात आली आहे. 
६८ वर्षांचा इतिहास 
संघाचे 'ऑर्गनायझर' हे इंग्रजी मुखपत्र साप्ताहिकाच्या स्वरूपात जुलै १९४७ मध्ये सुरु झाले.भारत प्रकाशनचे नवे व्यवस्थापन येण्याच्या काही महिने आधी म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये त्याचे नियतकालिकाच्या रूपाने 'रिलॉन्च' केले गेले.
ऑर्गनायझर'नंतर काही महिन्यांनी १४ जानेवारी १९४८ रोजी 'पान्चजन्य'हे हिंदी मुखपत्र सुरु झाले. अटल बिहारी बाजपेयी त्याचे पहिले संपादक होते.