Lakhimpur Kheri Violence: मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा केंद्राचा प्रयत्न, Priyanka Gandhi' यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:37 AM2021-10-11T09:37:41+5:302021-10-11T09:41:24+5:30

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस Priyanka Gandhi यांनी रविवारी येथे केला.

Lakhimpur Kheri Violence: Center's attempt to save minister's son, Priyanka Gandhi's attack | Lakhimpur Kheri Violence: मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा केंद्राचा प्रयत्न, Priyanka Gandhi' यांचा हल्लाबोल

Lakhimpur Kheri Violence: मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा केंद्राचा प्रयत्न, Priyanka Gandhi' यांचा हल्लाबोल

Next

वाराणसी : लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला. त्या म्हणाल्या, “भाजपचे नेते आणि त्यांचे अब्जाधीश संपत्तीचे मित्रवगळता देशात कोणीही सुरक्षित नाही.”
किसान न्याय रॅलीत पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला करून त्या म्हणाल्या, “पंतप्रधान देशात प्रवास करतात, विदेशातही जातात. फक्त त्यांना वेळ नाही, तो कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांशी बोलायला. मोदी नुकतेच लखनौला प्रदर्शनासाठी गेले होते; परंतु, अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या लखीमपूर खेरीला ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी जाऊ शकले नाही.” 

Web Title: Lakhimpur Kheri Violence: Center's attempt to save minister's son, Priyanka Gandhi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.