शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

...म्हणून भारताच्या या भागात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात लोक, आता 105 जोडप्यांनी घेतले 'सात फेरे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 2:42 PM

एका संस्थेने या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा विडा उचलला होता. आता यासंस्थेने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांना लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचवले आहे.  संबंधित संस्था 2017पासून यासाठी प्रयत्न करत होती. (live in relationship)

ठळक मुद्देझारखंडमधील खुंटी येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे 105 जोडपे आज वैवाहिक बंधनात अडकले. गरीबीमुळे या जोडप्यांची लग्न करण्याची आणि लोकांना भोजन देण्याची परिस्थिती नव्हती. या लग्न सोहळ्याला डीसी आणि एसपींसह सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रांची -झारखंडमधील (Jharkhand) खुंटी (khunti) येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे 105 जोडपे (couples ) आज वैवाहिक बंधनात अडकले. गरीबीमुळे या जोडप्यांची लग्न करण्याची आणि लोकांना भोजन देण्याची परिस्थिती नव्हती. समाजाज 'ढुकू' म्हणून या लोकांचा तिरस्कार केला जातो. मात्र, आता हे जोडपे विवाहाच्या बंधनात अडकल्याने त्यांना सामाजिक न्याय मिळाला आहे. राज्यपाल द्रोपदी मुर्मू आणि केंद्रीय सचिव एन एन सिन्हा यांनी या जोडप्यांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याला डीसी आणि एसपींसह सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सरना पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. (Jharkhand live in relationship 105 couples in marital bondage in khunti)105 जोडप्यांनी घेतले सात फेरे - एका संस्थेने या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा विडा उचलला होता. आता यासंस्थेने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांना लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचवले आहे.  संबंधित संस्था 2017पासून यासाठी प्रयत्न करत होती.

बोंबला! शाळेऐवजी घरातच अभ्यास व्हावा म्हणून विद्यार्थ्यानं शिक्षिकेशीच बांधली लग्नगाठ; लोक म्हणाले....

...म्हणून येथील लोकांवर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याची येते वेळ -येथील लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. हे लोक लग्न आणि लग्नाचे भोजनही देऊ शकत नाहीत. यामुळे या लोकांवर लिव्ह इनमध्ये राहण्याची वेळ येते. यामुळे या लोकांना ढुकू म्हणून संबोधले जाते. सामाजिक कार्यक्रमांत भाग घेण्याचा त्यांचा अधिकारही काढून घेतला जातो. तसेच या लोकांना नेहमीच टोमणे ऐकावे लागतात. दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतलीसरकारी सुविधांपासून राहावे लागते वंचित -लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या दोघांनाच नाही, तर त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांनाही समाज्याच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो. तसेच सरकारी योजना, जसे विधवा पेन्शन, आधार कार्ड, राशन कार्ड तयार करण्यातही या समाजातील लोकांना प्रचंड त्रास होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित संस्थेने यांचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी त्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले. यावेळी राज्यपालांनी स्वतःच, या लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. 

 

टॅग्स :Jharkhandझारखंडmarriageलग्न