शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तर भारतच आधी टाकेल पाकिस्तानवर अणुबॉम्ब

By admin | Updated: March 22, 2017 07:50 IST

युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला अणु हल्ला करण्याची संधी न देता भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 22 - युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला अणु हल्ला करण्याची संधी न देता भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल असा दावा करण्यात आला आहे. वॉशिंग्टनमध्ये 'कार्नेगी इंटरनॅशनल न्यूक्लिअर पॉलिसी कॉन्फ्रेन्स'दरम्यान हा दावा करण्यात आला. दक्षिण आशियातील आण्विक क्षेत्रातील तज्ञ विपुल नारंग यांनी हा दावा केला. 
 
अणु हल्ला न करण्याच्या धोरणामध्ये बदल करून भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल असा त्यांचा दावा आहे. नारंग हे मेसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये दक्षिण आशियातील आण्विक धोरणाविषयीचे तज्ञ आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तशी परिस्थिती उद्भवली तर भारत पाकिस्तानला कोणतीही संधी देणार नाही. पहिले हल्ला न करण्याचं आपलं धोरण बाजुला ठेवून आधी भारतच पाकिस्तानवर अणु हल्ला करेल असं ते म्हणाले.  
 
अणु हल्ला करताना पाकिस्तानच्या अणु केंद्रांना भारताकडून लक्ष्य केंद्र केलं जाईल. त्यामुळे भारताच्या कोणत्याही शहरावर अणु हल्ल्याचा धोका राहणार नाही आणि युद्धपरिस्थितीत भारताचं पारडं वर राहिल. पाकिस्तानला भारत संधी देणार नाही याचे पुरावे दिवसेंदिवस वाढत आहेत असं नारंग म्हणाले. आपल्या विधानाचा पुरावा म्हणून नारंग यांनी माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या  'चॉइसेस : इनसाइड द मेकिंग ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी'चं उदाहरणही दिलं.  
 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काश्मीरच्या उरी येथील भारतीय लष्‍कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता यामध्ये अनेक भारतीय जवान शहिद झाले होते.  त्यानंतर भारताकडून लष्कराने पहिल्यांदाच लाइन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये (POK) घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उध्वस्त केले. या कारवाईत जवळपास 38 दहशतवादी ठार मारण्यात आले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.