शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

India China FaceOff: हॉट स्प्रिंगपासून २ किमी मागे हटलं चिनी सैन्य; पैंगोग अन् डेपसांगमध्ये जैसे थे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 08:52 IST

गलवान खोऱ्यातील विवादीत जागेवरुन दोन्ही सैन्य मागे हटलं तरी आताही पैंगोंग लेक, डेपसांग परिसरात दोन्ही देशाचे सैन्य मागे हटलं नाही

ठळक मुद्देपैंगोग लेक आणि डेपसांग क्षेत्राबाबत गुरुवार शुक्रवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यताहॉट स्प्रिंग सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १५ वरुन दोन्ही देशांचे सैन्य मागेसुमारे ४० हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात

लडाख – भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर आता काही प्रमाणात सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे. वास्तविक नियंत्रण रेषा(LAC) वरुन दोन्ही देशाचे सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. ताज्या माहितीनुसार सैन्य हॉट स्प्रिंग परिसरातून २ किमी मागे हटलं आहे. आगामी काळात सीमेवरील तणाव आणखी सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मुत्सदी आणि सैन्य पातळीवरील चर्चा सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार गलवान खोऱ्यातील विवादीत जागेवरुन दोन्ही सैन्य मागे हटलं तरी आताही पैंगोंग लेक, डेपसांग परिसरात दोन्ही देशाचे सैन्य मागे हटलं नाही. भारतीय आणि चिनी सैनिक लडाख सेक्टरमधील गलवान खोरे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा पोस्टमधून मागे हटले आहे. पैंगोग लेक आणि डेपसांग क्षेत्राबाबत गुरुवार शुक्रवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याचा हवाला देत असा दावा केला आहे की, हॉट स्प्रिंग सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १५ वरुन दोन्ही देशांचे सैन्य सुमारे २ किमी मागे गेले आहे. तिथे चीनकडून जे तंबू लावण्यात आले होते, चिनी सैन्याने त्यांना तेथून हटवले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराअंतर्गत माघार घेण्यावर सहमती झाली आहे. आज गुरुवारी सैन्याने तेथून पूर्णपणे माघार घेतली आहे की नाही याची पडताळणी केली जाईल.

दोन्ही सैन्य सध्या गोगरा भागात समोरासमोर उभे आहेत. परंतु पुढील एक-दोन दिवसांत सैन्य येथूनही माघार घेईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी सोमवारी चिनी सैन्याने पूर्वेकडील लडाखमधील गलवान खोऱ्यातून माघार घेतली होती. दोन्ही देशांच्या सैन्याने हिंसक झटापटीच्या जागेपासून १.५  कि.मी. मागे गेले आहेत. आता यास बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून यापुढे हिंसक घटना घडू नयेत.

सीमेवर 40 हजार सैनिक!

एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे ४० हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे ४०० सैनिक मागे हटले आहेत. परंतु अशी आशा आहे की, संवादाच्या आणखी काही फेऱ्यानंतर दोन्ही बाजूंकडून सैन्याची ताकद कमी होईल. ६ जून रोजी कोअर कमांडरच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली. यानंतर ३० जून रोजी कोअर कमांडरच्या तृतीय स्तराच्या बैठकीत डिसेंजेजमेंटची चर्चा झाली होती.

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान