शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

India China FaceOff: हॉट स्प्रिंगपासून २ किमी मागे हटलं चिनी सैन्य; पैंगोग अन् डेपसांगमध्ये जैसे थे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 08:52 IST

गलवान खोऱ्यातील विवादीत जागेवरुन दोन्ही सैन्य मागे हटलं तरी आताही पैंगोंग लेक, डेपसांग परिसरात दोन्ही देशाचे सैन्य मागे हटलं नाही

ठळक मुद्देपैंगोग लेक आणि डेपसांग क्षेत्राबाबत गुरुवार शुक्रवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यताहॉट स्प्रिंग सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १५ वरुन दोन्ही देशांचे सैन्य मागेसुमारे ४० हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात

लडाख – भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर आता काही प्रमाणात सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे. वास्तविक नियंत्रण रेषा(LAC) वरुन दोन्ही देशाचे सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. ताज्या माहितीनुसार सैन्य हॉट स्प्रिंग परिसरातून २ किमी मागे हटलं आहे. आगामी काळात सीमेवरील तणाव आणखी सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मुत्सदी आणि सैन्य पातळीवरील चर्चा सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार गलवान खोऱ्यातील विवादीत जागेवरुन दोन्ही सैन्य मागे हटलं तरी आताही पैंगोंग लेक, डेपसांग परिसरात दोन्ही देशाचे सैन्य मागे हटलं नाही. भारतीय आणि चिनी सैनिक लडाख सेक्टरमधील गलवान खोरे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा पोस्टमधून मागे हटले आहे. पैंगोग लेक आणि डेपसांग क्षेत्राबाबत गुरुवार शुक्रवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याचा हवाला देत असा दावा केला आहे की, हॉट स्प्रिंग सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १५ वरुन दोन्ही देशांचे सैन्य सुमारे २ किमी मागे गेले आहे. तिथे चीनकडून जे तंबू लावण्यात आले होते, चिनी सैन्याने त्यांना तेथून हटवले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराअंतर्गत माघार घेण्यावर सहमती झाली आहे. आज गुरुवारी सैन्याने तेथून पूर्णपणे माघार घेतली आहे की नाही याची पडताळणी केली जाईल.

दोन्ही सैन्य सध्या गोगरा भागात समोरासमोर उभे आहेत. परंतु पुढील एक-दोन दिवसांत सैन्य येथूनही माघार घेईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी सोमवारी चिनी सैन्याने पूर्वेकडील लडाखमधील गलवान खोऱ्यातून माघार घेतली होती. दोन्ही देशांच्या सैन्याने हिंसक झटापटीच्या जागेपासून १.५  कि.मी. मागे गेले आहेत. आता यास बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून यापुढे हिंसक घटना घडू नयेत.

सीमेवर 40 हजार सैनिक!

एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे ४० हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे ४०० सैनिक मागे हटले आहेत. परंतु अशी आशा आहे की, संवादाच्या आणखी काही फेऱ्यानंतर दोन्ही बाजूंकडून सैन्याची ताकद कमी होईल. ६ जून रोजी कोअर कमांडरच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली. यानंतर ३० जून रोजी कोअर कमांडरच्या तृतीय स्तराच्या बैठकीत डिसेंजेजमेंटची चर्चा झाली होती.

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान