शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India China FaceOff: हॉट स्प्रिंगपासून २ किमी मागे हटलं चिनी सैन्य; पैंगोग अन् डेपसांगमध्ये जैसे थे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 08:52 IST

गलवान खोऱ्यातील विवादीत जागेवरुन दोन्ही सैन्य मागे हटलं तरी आताही पैंगोंग लेक, डेपसांग परिसरात दोन्ही देशाचे सैन्य मागे हटलं नाही

ठळक मुद्देपैंगोग लेक आणि डेपसांग क्षेत्राबाबत गुरुवार शुक्रवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यताहॉट स्प्रिंग सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १५ वरुन दोन्ही देशांचे सैन्य मागेसुमारे ४० हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात

लडाख – भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर आता काही प्रमाणात सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे. वास्तविक नियंत्रण रेषा(LAC) वरुन दोन्ही देशाचे सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. ताज्या माहितीनुसार सैन्य हॉट स्प्रिंग परिसरातून २ किमी मागे हटलं आहे. आगामी काळात सीमेवरील तणाव आणखी सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मुत्सदी आणि सैन्य पातळीवरील चर्चा सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार गलवान खोऱ्यातील विवादीत जागेवरुन दोन्ही सैन्य मागे हटलं तरी आताही पैंगोंग लेक, डेपसांग परिसरात दोन्ही देशाचे सैन्य मागे हटलं नाही. भारतीय आणि चिनी सैनिक लडाख सेक्टरमधील गलवान खोरे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा पोस्टमधून मागे हटले आहे. पैंगोग लेक आणि डेपसांग क्षेत्राबाबत गुरुवार शुक्रवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याचा हवाला देत असा दावा केला आहे की, हॉट स्प्रिंग सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १५ वरुन दोन्ही देशांचे सैन्य सुमारे २ किमी मागे गेले आहे. तिथे चीनकडून जे तंबू लावण्यात आले होते, चिनी सैन्याने त्यांना तेथून हटवले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराअंतर्गत माघार घेण्यावर सहमती झाली आहे. आज गुरुवारी सैन्याने तेथून पूर्णपणे माघार घेतली आहे की नाही याची पडताळणी केली जाईल.

दोन्ही सैन्य सध्या गोगरा भागात समोरासमोर उभे आहेत. परंतु पुढील एक-दोन दिवसांत सैन्य येथूनही माघार घेईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी सोमवारी चिनी सैन्याने पूर्वेकडील लडाखमधील गलवान खोऱ्यातून माघार घेतली होती. दोन्ही देशांच्या सैन्याने हिंसक झटापटीच्या जागेपासून १.५  कि.मी. मागे गेले आहेत. आता यास बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून यापुढे हिंसक घटना घडू नयेत.

सीमेवर 40 हजार सैनिक!

एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे ४० हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे ४०० सैनिक मागे हटले आहेत. परंतु अशी आशा आहे की, संवादाच्या आणखी काही फेऱ्यानंतर दोन्ही बाजूंकडून सैन्याची ताकद कमी होईल. ६ जून रोजी कोअर कमांडरच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली. यानंतर ३० जून रोजी कोअर कमांडरच्या तृतीय स्तराच्या बैठकीत डिसेंजेजमेंटची चर्चा झाली होती.

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान