शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 7:54 AM

गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता.

लडाख : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता. मात्र, सोमवारी चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. युद्धात सारे काही माफ असते म्हणतात. मात्र, दिलेला शब्द पाळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. मात्र, चीनने मागे हटण्याचा शब्द मोडला आणि नव्या दमाचे सैनिक घेऊन भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी परतला. 

चीनी मिडीया सीमापार युद्धाभ्यासाचे फोटो शेअर करत होता. या फोटोंद्वारे चीन जो इशारा देत होता, तोच त्याने प्रत्यक्षात आणला. भारतीय हद्दीतून मागे हटण्याची तयारी चीनने दर्शविली होती. तसा दिखावा केला आणि अचानक हल्ला केला. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीमध्ये कसे भारतीय जवान शहीद झाले. 

भारताकडून कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू चीनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होते. ते झटापटीच्या एक तास आधीपर्यंत चीनच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. सोमवारी सकाळी त्यांनी चीनशी चर्चा केली. त्य़ावेळी चीनने भारतीय सीमेतून मागे हटण्याचे मान्य केले.यानंतर संतोष बाबू ५० जवानांसह स्टँड ऑफ पॉईंटची माहिती घेण्यासाठी गेले. चीनच्या सैन्याने दिलेल्या आश्वासनानुसार सैन्य माघारी परतले की पुन्हा चीनने काही दगाबाजी केली हे पाहण्यासाठी ते गेले होते. भारतीय सैन्य एलएसीवरील चीनी सैन्याने बनविलेले बेकायदेशीर घरे तोडत होती. याचवेळी चीनचे सैनिक मोठ्या संख्येने परत येऊन ठेपले. भारताचे 50 आणि चीनचे 250 सैनिक एकमेकांसमोर आले. भारतीय जवानांनी त्यांना भारतीय सीमेत जाण्यापासून रोखले. तेव्हा चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर काटेदार दांड्यांनी हल्ला केला. 

दोन्ही सैनिकांमध्ये ही झटापट गलवान नदीमध्येच होत होती. नदीचा प्रवाह वेगवान होता. यामुळेच मोठ्या प्रमाणावर सैनिकांचे जीव गेले. कारण जखमी झाल्यानंतर दोन्ही बाजुचे सैनिक पाण्याच्या प्रवाहात पडत होते. PP14 वर पोहोचण्यासाठी भारतीय जवानांना 5 ठिकाणी गलवान नदी पार करावी लागते. आधी कर्नल संतोषसह तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर भारतीय सैन्याने झीरो तापमानामध्ये असलेले सर्व जखमी सैनिक शहीद झाल्याचे सांगितले. या झटापटीत चीनचे 43 सैनिकही ठार झाले आहेत.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख