India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:30 PM2020-06-16T14:30:22+5:302020-06-16T15:17:34+5:30

भारतीय सैनिकांनी दोनवेळा चीनच्या हद्दीत प्रवेश केला. तसेच चीनच्या सैन्याला चिथावणी दिली.

Galwan Valley china blames on Indian soldiers; indians Provoked attacks first in ladakh | India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Next

नवी दिल्ली : लडखमधील गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. यावर चीनने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैनिकांनीच चीनच्या सैनिकांवर प्रथम आक्रमण केल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. 


भारतीय सैनिकांनी दोनवेळा चीनच्या हद्दीत प्रवेश केला. तसेच चीनच्या सैन्याला चिथावणी दिली. यामुळे दोन्ही सैन्यामध्ये झटापट झाल्याचा दावा चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्याने केला आहे. तसेच भारताने त्यांच्या बाजुने निवेदन सादर करत सीमारेषा ओलांडण्यास किंवा सीमेवरील परिस्थीती गंभीर होणारी कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केल्याचे चीनने म्हटले आहे. 




तसेच चीन आणि भारतीय सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये रात्री उद्भवलेल्या परिस्थितीवरून वाढलेला तणाव निवळण्यासाठी एकमत झाले आहे. यापुढे सीमेवर शांतता ठेवण्याचे दोन्ही देशांनी मान्य केल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. 


कोरोना व्हायरसमुळे जगभरात टीका आणि विरोधाचा सामना करावा लागत असल्याने चीन तणावात आहे. यामुळे चीनमधील उत्पादनांची मागणीही घटलेली आहे. यामुळे चीनच्या लोकांचा विरोधही सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादाची लाट आणण्यासाठी आणि लोकांना त्यात गुंतवून ठेवण्यासाठी चीन भारत आणि तैवानसोबत तणाव वाढवू लागला आहे. यामुळे चीनने भारताच्या लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. यावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरु आहे. एकदा दोन्ही सैन्यादरम्यान दगडफेकही झाली आहे. 

1967 मध्येही झालेला हिंसक हल्ला
भारत आणि चीनमध्ये शेवटचा गोळीबार 1967 मध्ये झाला होता. म्हणजे 53 वर्षांपूर्वी. ही हिंसा सिक्किममध्ये झाली होती. चीन अशासाठी चिडला होता कारण भारत आपल्या क्षेत्रामध्ये 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. 1967 च्या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

Big Breaking भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

Web Title: Galwan Valley china blames on Indian soldiers; indians Provoked attacks first in ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.