शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

इराण युद्ध थंडावले अन् भारताने संधी साधली! २५ दिवसांवरून तेलसाठा ६० दिवसांवर नेला; आयात शुल्कातही कपात! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:20 IST

India Iran War Impact: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ६० दिवसांचा तेलसाठा असल्याची घोषणा केली आहे. तसेच आयात शुल्कात कपात आणि निर्यातदारांना १००% विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर.

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील जनतेला आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. "भारताकडे पुढील ६० दिवसांचा तेलसाठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही," असे सरकारने स्पष्ट केले आहे. गुरुवारी विविध मंत्रालयांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत इंधन पुरवठा आणि निर्यातीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.

इराण युद्धानंतर समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारताकडील तेलसाठा हा २५ दिवस पुरेल एवढाच होता. परंतू, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने भारताने अमेरिका, रशियासह इतर देशांकडून कच्चे तेल मागविण्यास सुरुवात केली होती. सुमारे ४२ देशांकडून एलपीजीसह तेल आणण्यात येत होते. अशातच काल इराणकडूनही कच्चे तेल पाठविण्यात आले. या प्रयत्नांमुळे भारताकडे आता ६० दिवस म्हणजेच दोन महिने पुरेल एवढा तेलसाठा निर्माण झाला आहे. 

पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्क घटवले
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून जहाजांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. याचा फटका बसू नये म्हणून सरकारने पेट्रोकेमिकल क्षेत्रातील अनेक उत्पादनांवरील आयात शुल्क पुढील ३ महिन्यांसाठी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योगांना कच्चा माल स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

निर्यातदारांसाठी १००% विमा कवच
युद्धजन्य परिस्थितीत निर्यातदारांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने ECGC कव्हरमध्ये मोठी वाढ केली आहे. सामान्यतः ८०-८५% असणारे विमा कवच आता १००% करण्यात आले आहे. विम्याचा हप्ता वाढवला जाणार नाही, उलट वाढीव विम्याचा अतिरिक्त खर्च सरकार स्वतः उचलणार आहे. या भागातून होणाऱ्या एकूण ५६% निर्यातीवर युद्धाचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.

मिरांडा हाऊस वादावर स्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपबाबत सरकारने खुलासा केला की, मिरांडा हाऊस कॉलेजमधील आंदोलन एलपीजी टंचाईमुळे नव्हते, तर अन्नाच्या दर्जाबाबत होते. सध्या देशातील सर्व रिटेल आऊटलेट्स सुरळीत सुरू असून व्यावसायिक पुरवठा ७०% पर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे.

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पFuel Crisisइंधन टंचाई