शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

हडप्पा संस्कृती ५५०० वर्षे जुनी नसून ८००० वर्षे जुनी

By admin | Updated: May 29, 2016 17:21 IST

आयआयटी-खड़गपुर मधील शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मिळून केलेल्या संशोधनात सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही ५५०० वर्षे जुनी नसून कमीत कमी ८००० वर्षे जुनी

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २९ : आयआयटी-खड़गपुर मधील शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मिळून केलेल्या संशोधनात सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही ५५०० वर्षे जुनी नसून कमीत कमी ८००० वर्षे जुनी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. म्हणजेच हडप्पा संस्कृती ही इजिप्त (इ.स.पूर्व ७००० ते इ.स.पूर्व ३०००) आणि मेसोपोटेमिया (इ.स.पूर्व ६५०० ते इ.स.पूर्व ३१००) या जगातील सर्वात जुन्या असलेल्या संस्कृतींच्या आधीच्या कालखंडात अस्तित्त्वात होती. याबरोबरच शास्त्रज्ञांना हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वी सुमारे एक हजार वर्षे अस्तिवात असलेल्या संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत.
 
हे संशोधन प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नेचर जर्नल मध्ये २५ मे रोजी समाविष्टकरण्यात आले आहे. यामुळे जगात विविध मानवी संस्कृतींचा उदय आणि त्यांचा कार्यकाळ याबाबत नव्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे. हवामानात होणारे बदल आणि क्रमाक्रमाने कमी होत जाणारा पाऊस यामुळे ही संस्कृती सुमारे ३००० वर्षांपूर्वी लोप पावली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हडप्पा संस्कृती ही पाकिस्तानातील मोहेंजोदाडो आणि हडप्पा तर भारतातील लोथल, धोलावीरा आणि काली बंगा या पलीकडे देखील वाढली होती आणि हरियाणा मधील भिर्दाना आणि राखीगाढी या आतील भागांपर्यंत परसली होती हे सिद्ध करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते. यात शास्त्रज्ञांना प्राण्यांच्या हाडांचे तसेच दातांचे अवशेष मिळाले आहेत.

दुष्काळसदृश्य स्थितीतही हडप्पा संस्कृती वाढली 
 
हडप्पा संस्कृतीच्या शेवटचा कालखंड हा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, लोकसंख्येतील घट, हिंसा आणि हडप्पा कालीन लिपीचा अस्त अशा अनेकसामाजिक बदलांचा साक्षीदार होता असे एका शास्त्रज्ञाने सांगितले. संशोधनातील निरीक्षणानुसार पाऊस कमी हा सात हजार वर्षापासून होत गेला पण संकृती लोप पावली नाही. या कालखंडातील लोक हे बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारे होते. त्यांनी हवामांतील बदलांनुसार पिकं घेण्याच्या पद्धतीत बदल देखील केले होते. पिक टंचाईशी कसा सामना करायचा हे हडप्पा संस्कृतीतील सापडलेले पिकांच्या साठवणीचे सुसंघटित तंत्राचे पुरावे दाखवून देतात. तसेच यावरून त्याकाळातील पिक प्रक्रिया ही अधिक वैयक्तिक व घरगुती आधारित पीक प्रक्रिया होती असे दिसून येते. हे बदलत्या हवामानाबरोबरच स्थलांतर होण्याचे आणि परिणामी संस्कृती नामशेष होण्याचे प्रमुख कारण असावे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.