शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

मार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 9:42 PM

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळावरून सत्ताधाऱ्यांचं टीकास्त्र

नवी दिल्ली: मोदी सरकारनं लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर करून घेतली. मात्र विधेयकांवर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपसभापतींच्या समोरील नियम पुस्तिकेची तोडफोड केली. माईकहीदेखील तोडण्यात आले. यावरून आता भाजपनं विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारमधील तीन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांवर टीका केली.केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी आणि पीयूष गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा अनादर झाला. ही घटना अतिशय दु:खद आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचा विधेयकांना विरोध होता. त्यांनी त्यांच्या जागेवर बसून विधेयकाच्या विरोधात मतदान करायला हवं होतं. उपसभापतींनी १३ वेळा खासदारांना त्यांच्या जागेवर जाण्यास सांगितलं. मात्र तरीही खासदार ऐकले नाहीत. संसदेसाठी कालचा दिवस अतिशय लज्जास्पद होता. माईक तोडण्यात आले. नियम पुस्तिका फाडण्यात आली. त्यावेळी तिथे मार्शल नसते, तर उपसभापतींवर हल्लादेखील झाला असता,' असं प्रसाद म्हणाले.काल सहा मंत्र्यांची पत्रकार परिषद; विरोधकांवर टीकास्त्रराज्यसभेत खासदारांनी घातलेल्या गोंधळावरून काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सहा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. 'राज्यसभेत घडलेला प्रकार अतिशय दु:खद, लज्जास्पद आणि दुर्दैवी होता. विरोधकांच्या वर्तणुकीमुळे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे,' अशा शब्दांत सिंह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. राज्यसभेतल्या गोंधळानंतर राजनाथ यांच्यासह सहा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं.

'राज्यसभेत शेतीशी संबंधित २ विधेयकांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी सदनात जो प्रकार घडला, तो अतिशय दु:खद आणि दुर्दैवी होता. यापेक्षा पुढे जाऊन बोलायचं झाल्यास झालेली घटना लज्जास्पद होती, असं मी म्हणेन. राज्यसभेच्या उपसभापतींना काय वागणूक देण्यात आली, ती सर्वांनी पाहिली,' असं राजनाथ म्हणाले. 'विरोधी पक्षाच्या खासदारांच्या वर्तनामुळे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. जेव्हा जेव्हा संसदेत मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा तेव्हा लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. सभागृहात चर्चा घडवून आणणं सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पण संसदेची प्रतिष्ठा राखणं विरोधकांचंही कर्तव्य आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा