शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात पाणीप्रश्नी चर्चेचा ठराव आणू सभापतींचे निर्देश : जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

By admin | Updated: March 21, 2015 00:02 IST

नाशिक : महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधान परिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधान परिषद सभापतींनी सरकारला दिले.

नाशिक : महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधान परिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधान परिषद सभापतींनी सरकारला दिले. आमदार जयंत जाधव यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली, त्यात म्हटले की, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातील २० टीएमसी. पाणी मुंबईला देऊन उर्वरित ६३ टीएमसी पाणी गुजरातला दिले जाणार असल्याची माहिती जानेवारीत उघडकीस आली. त्याच बरोबरच नारपार खोर्‍यातील महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील ३२ टीएमसी पाणी गुजरात कच्छ सौराष्ट्रामध्ये नेण्याचे गुजरात सरकार व केंद्र सरकारचे नियोजन असल्याचे समजते. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व संस्थांकडून नाशिकमध्ये आंदोलने केली गेली असून, दमणगंगा खोर्‍यातील उपलब्ध ८३ टीएमसी पाण्यापैकी १५ टक्के पाणी स्थानिक जनतेला राखीव ठेवून उर्वरित पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने केंद्र सरकारला सादर करावा, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. नार खोर्‍यातील उपलब्ध ५० टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात वळविण्याचीही मागणी आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील अतिरिक्त पाणी प्रवाही पद्धतीने मुकणे धरणातून नाशिक व मराठवाड्याला देणे शक्य असूनही शासनाकडून कार्यवाही केली जात नसल्याने शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्यावर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महाराष्ट्राच्या हद्दीतील एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ दिले जाणार नाही त्यासाठी दमणगंगा खोर्‍यातील भुगड, खार्गीहील हे दोन धरणे बांधून ते बोगद्याद्वारे जोडून पिंजाळ धरणात आणले जाईल व त्यातून २० टीएमसी पाणी मुंबईला, तर १० टीएमसी पाणी वैतरणा धरणात व तेथून गोदावरी खोर्‍यात आणण्यात येईल, असे सांगितले. नार प्रकल्पातील २९ टीएमसी समुद्राला वाहून जाणारे पाणी ७०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरून उचलून आणणे व्यवहार्य नसल्याने ते सरदार सरोवरात टाकले जाईल व स‘ाद्री रांगामधील ११ टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात टाकावे आणि या राष्ट्रीय प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकारने करावा असा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. दमणगंगा तसेच नार-पार खोर्‍यातील पाणी वापराबाबत कोणताच करार झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी याप्रश्नी सभागृहात चर्चेचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी केल्यावर या प्रश्नावर चर्चा घडवून ठराव करण्यात येईल, असे निर्देश सभापतींनी दिले.