शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’चा घोळ

By admin | Updated: January 9, 2016 03:13 IST

वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) घोळ संपविण्यासाठी संसदीय व्यवहार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची खास भेट घेतली

वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) घोळ संपविण्यासाठी संसदीय व्यवहार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची खास भेट घेतली असली तरी तिचा काही उपयोग होईल, असे दिसत नाही. आपल्या तीन अटींवर कोणतीही तडजोड करण्यास कॉंग्रेस तयार नसल्याचे स्पष्ट करतानाच, रा.स्व. संघ व स्वदेशी जागरण मंच यांच्या दबावामुळे भारतीय जनता पक्षाचीच हे विधेयक मंजूर करण्याची इच्छा नसल्याचा आरोप, कॉंग्रेस प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी केला आहे पण कॉंग्रेस तरी कुठे तडजोडीसाठी तयार आहे? प्रस्तावित विधेयकामुळे ग्राहकाना तब्बल २२ ते २७ टक्के कर अदा करावा लागेल, तर आमच्या विधेयकात मात्र केवळ १६ ते १८ टक्केच कराची तरतूद असल्याने घटनात्मक तरतुदीच्या माध्यमातून जीएसटीची कमाल मर्यादा १८ टक्के निश्चित करण्याच्या मागणीवर तडजोड करण्यास कॉंग्रेस अजिबात तयार नाही. सरकारने या मागणीपुढे मान तुकविल्यास, अपेक्षित कर संकलन न होण्याच्या स्थितीत, केंद्र व राज्य सरकारांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकेल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी मर्यादा घातल्यास, दारू, सिगारेटसारख्या उत्पादनांवरील कर कमी होऊन, त्यांचा खप वाढू शकेल. त्याचप्रमाणे सरकारला चैनीच्या वस्तूंवरही जादा कर आकारता येणार नाही. त्यामुळे सरसकट १८ टक्के मर्यादेचा आग्रह सोडून देऊन, अरविंद सुब्रह्मण्यम समितीच्या शिफारसी स्वीकारणे हाच पर्याय योग्य ठरतो. सुब्रह्मण्यम समितीने जीवनावश्यक वस्तूंसाठी १२, चैनीच्या वस्तूंसाठी ४० व इतर सर्व वस्तूंसाठी १७ ते १८ टक्के कर, अशी त्रिस्तरीय रचना सुचविली आहे. उत्पादक राज्यांना एक टक्का अतिरिक्त कर लावण्यास मुभा देणारी तरतूदही कॉंग्रेसला नको आहे. पण ही तरतूद केवळ प्रारंभीच्या दोन वर्षांसाठीच असून तशी मागणी केवळ भाजपाशासित राज्यांचीच नव्हे, तर एकूण पाच गैर भाजपाशासित राज्यांचीदेखील आहे. कर वाटणीवरून राज्याराज्यांमध्ये वाद उद्भवल्यास त्याच्या निपटाऱ्यासाठी निर्माण करावयाच्या यंत्रणेसंदर्भात मात्र कॉंग्रेसची भूमिका योग्य आहे. वादी व प्रतिवादींकडेच खटल्याचा निकाल देण्याची जबाबदारी कशी सोपविता येईल? अशा वादांच्या निपटाऱ्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणा असावी, ही कॉंग्रेसची मागणी मोदी सरकारने मान्य करावयास हवी. परंतु प्रश्न हा आहे, की उभय पक्षांची तडजोडीची इच्छा आहे, की त्यांना केवळ राजकारणच करायचे आहे?