शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खताच्या वाढत्या किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, DAP वरील सब्सिडी वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खतांच्या किंमतीसंदर्भात एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यावेळी जागतीक स्थरावर खतांच्या किंमती वाढल्या असल्या तरी, शेतकऱ्यांना जुन्या दरातच खत मिळायला हवे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारने (Narendra Modi government) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. डीएपीच्या कीमती वाढताच मोदी सरकारने यावरील सब्सिडीदेखील वाढवली आहे. जागतिक स्थरावर किंमती वाढल्या असल्या तरी डीएपी खताची एक बॅग शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांनाच मिळेल, असे सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात, सरकारने डाय अमोनियम फास्फेट (डीएपी) खतावरील सब्सिडी 140 टक्क्यांनी वाढवली असल्याचेही एका निवेदनात म्हणण्यात आले आहे. (Great relief to farmers Narendra Modi government hikes subsidy on DAP fertilizer by 140 per cent)

निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खतांच्या किंमतीसंदर्भात एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यावेळी जागतीक स्थरावर खतांच्या किंमती वाढल्या असल्या तरी, शेतकऱ्यांना जुन्या दरातच खत मिळायला हवे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

अरे व्वा! महिन्याला फक्त 1 रुपया गुंतवून मिळतोय 2 लाखांचा विमा; मोदी सरकारची 'ही' शानदार योजना

निवेदनात म्हणण्यात आले आहे की, DAP खतासाठी असलेली 500 रुपये प्रति बॅग सब्सिडी वाढवून, आता 1200 रुपये प्रति बॅग करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात DAP च्या किंमती वाढल्या असल्या तरी, ते शेतकऱ्यांना 1200 रुपयांनाच विकण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. तर, वाढलेल्या किमतींचा अतिरिक्त बोजा केंद्र सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

गत वर्षी, डीएपीची वास्तविक किंमत 1,700 रुपये प्रति बॅग होती. यात केंद्र सरकार 500 रुपये प्रति बॅग सब्सिडी देत होते. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना 1200 रुपये प्रति बॅग, या दराने खत विकत होत्या. मात्र, आता DAP मध्ये वापरले जाणारे फॉस्फोरिक अॅसिड आणि अमोनिया आदिंच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्थरावर 60 ते 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

तूर, मूग, उडदाची आयात खुली होताच दर आले खाली; धान्य बाजारपेठांमध्ये खळबळ 

डीएपी खताच्या किंमती वाढल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली होती. केंद्र सरकारने डाय अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खताच्या 50 किलो ग्रॅमच्या बॅगवर 700 रुपये, तर इतर काही खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर वर्षाला 20 हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. एवढेच नाही, तर हे देशातील अन्नदात्यांना गुलाम बनविण्याचे कारस्थान आहे, असा आरोप काँग्रेसने बुधवारी केला होता. तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी, या वाढलेल्या किंमती सरकारने मागे घ्याव्यात, असा आग्रहदेखील केला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस