शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकही गाव आदर्श दिसलेे नाही ग्राम स्वच्छता पाहणी समितीचे मत : ४० गावांचे गुणांकन करून जि.प. सीईओंना अहवाल सादर; हगणदरींचा प्रश्न

By admin | Updated: October 30, 2015 23:56 IST

सोबत फोटो-

सोबत फोटो-

जळगाव- जिल्ह्यातील कमाल भाग सधन आहे. पण शौचालयांबाबत स्थिती फारशी बरी नाही. हगणदरींचा प्रश्न आहे. जिल्ह्यात एकही आदर्श गाव (मॉडल व्हीलेज) आम्हाला पाहणीदरम्यान दिसले नाही. काही गावांमध्ये शाळांची स्वच्छता, दलित वस्तींची कामे चांगली आहेत, असे मत जिल्ह्यात ग्राम स्वच्छता अभियानासंबंधी पाहणीसाठी सातारा येथून आलेल्या समितीचे प्रमुख तथा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.
या समितीने बुधवार व गुरुवारी जिल्ह्यात ४० गावांची संत गाडगेबाबात ग्राम स्वच्छता अभियानासंबंधी पाहणी केली. या गावांची पाहणी करून समितीने गुणांकन केले व आपला अहवाल सीईओंना सादर केला. या पाहणीसंबंधी समितीने वार्तालाप केला. या वेळी सातारा जि.प.चे सीईओ नितीन पाटील, खंडाळा, जि.सातारा पं.स.चे सभापती रमेश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, पत्रकार प्रवीण शिंगटे आदी १५ सदस्य उपस्थित होते.

सातारा खूप पुढे
शौचालयांच्या लक्ष्यांकात सातारा जिल्हा पुढे आहे. तसे जळगाव जिल्ह्यात दिसले नाही. सातारा जिल्‘ात ९३ टक्के काम झाले आहे. जळगावात ५० टक्के काम राहीले आहे. यासंदर्भात लोकसहभाग वाढायला हवा, शौचालये वापरासंबंधी ग्रामस्थांची मानसिकता बदलायला हवी, असे मत सोनवलकरांनी व्यक्त केले.

कमानीवर ग्रा.पं.ची संकल्पना सातार्‍यात राबविणार
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती गावाच्या दर्शनी भागात भली मोठी कमान बांधून त्यावर उभारल्या आहेत. जागा नसली तर ग्रा.पं.उभारण्याची ही संकल्पना उपयोगात येते. ही संकल्पना सातारा येथे राबवू, असे सोनवलकर म्हणाले.

काँक्रीटीकर, भुयारी गटारींचे काम चांगले
आमच्या तीन गटांनी पाहणी केली. त्यात दलित वस्ती व गावात इतरत्र बांधलेले सिमेेंटचे रस्ते चांगले आहे. भुयारी गटारी व प्राथमिक शाळांची स्थितीही चांगली आहे. पण शाळांमध्ये शौचालयांचा वापर होत नाही, असे जाणवले.

सीईओंकडून सीईओंची स्तुती
सीईओ नितीन पाटील म्हणाले, जळगावच्या सीईओंची भेट झाली. त्यांनी स्वच्छतेसंबंधी चांगला कार्यक्रम आखला आहे. काम हाती घेतले आहे. ते दिसेल. पण ग्रामस्थांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

वित्त आयोगातून जि.प.लाही निधी द्यावा
पंचायत राज व्यवस्थेत जि.प. महत्त्वाची आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधी जि.प.लाही मिळावा, असे सोनवलकर म्हणाले.