शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

नेपाळ, बांगलादेश, भूतानला जाणे झाले सोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 3:04 AM

सीमेवर लागणा-या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बंद होतील व सीमा ओलांडण्यास कमी वेळ लागेल.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भारतातून रस्ते मार्गाने बांगलादेश, नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या प्रवासी बसेस आणि दुस-या व्यावसायिक वाहनांची वाहतूक सोपी होणार आहे. रस्तेवाहतूक व राजमार्ग मंत्रालय यासाठी सरळ नियम बनवण्याच्या तयारीत आहे. यामुळे सीमेवर लागणा-या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बंद होतील व सीमा ओलांडण्यास कमी वेळ लागेल.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने भारतीय केंद्रीय मोटार वाहन (भारत व शेजारी देशांमध्ये परिवहन सेवा विनियमन-माल वाहतूक व प्रवासी वाहन वाहतूक) नियम २०२० चा मसुदा जारी केला आहे. यावर संबंधितांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत. या नंतर नवे नियम लागू करण्यासाठी अंतिम अधिसूचना जारी केली जाईल.या नियमांतर्गत वाहनांना परमिट आणि संबंधित देशाच्या वाहनासंबंधी दस्तावेजांना समाविष्ट केले गेले आहे. यात वैध नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा पॉलिसीसंबंधी दस्तावेज असतील. याशिवाय प्रवाशांचे राष्ट्रीयत्वच्या तपशिलासोबत प्रवाशांची यादीही ठेवावी लागेल. वाहनचालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स तसेच त्याचा सहायक आणि वाहकाकडे बॅज व ओळखपत्र असणे आवश्यक आहे. नव्या नियमांअंतर्गत वाहनासमोर आणि मागे रवाना व्हायचे ठिकाण व पोहोचण्याचे ठिकाण याची माहिती द्यावी लागेल. याशिवाय वाहनावर रजिस्ट्रेशन क्रमांक असला पाहिजे. संबंधित राज्य सरकारांचे परिवहन अधिकारी सीमेवर असलेल्या इंटिग्रेटेड चेक पोस्टवर या दस्तावेजांची तपासणी करतील. सगळ््या बॉर्डर चेकपोस्टवर एक समान सुरक्षा,गुप्तचर आणि आणीबाणीतील चिकित्सेसाठी जबाबदारी निश्चित केली जाईल.अशा बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांसाठी आणीबाणीच्या अवस्थेत चिकित्सा सोयी उपलब्ध करण्यासाठी समन्वयाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारच्या चिकित्सा विभागाची असेल. इंटेलिजन्ससंंबंधी प्रकरणासाठी समन्वयाची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरो आणि त्याच्या नोडल एजन्सीवर असेल.याशिवाय सुरक्षेची जबाबदारीही राज्य सरकारच्या पोलिसांची असेल. रवाना व्हायच्या आधी प्रवाशांकडील तिकिटे, बसचा फिटनेस, प्रवासी-चालक-सहायक आणि त्यांच्याकडील सामानाची तपासणीसाठी हे सुनिश्चित केले जाईल की कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू नाही.>बससेवेमुळे वाढता तणाव थांबलाया शेजारी देशांसोबत बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (बीबीआयएन) मोटर वाहन समझोत्याअंतर्गत बस सेवा चालवली जाते. भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रवासी ढाका-कोलकाता, ढाका-आगरतळा, कोलकाता-ढाका-आगरतळा आणि ढाका-शिलाँग-गुवाहाटी बसमधून ये-जा करतात.याशिवाय भारत- नेपाळ यांच्यात काठमांडू-सिलिगुडी, महेंद्र नगर-डेहराडून तथा काशी-काठमांडू बस धावते. याच प्रकारे पाकिस्तानसोबतही दिल्ली-लाहोर बस सेवा फेब्रुवारी १९९९ सुरू केली गेली. त्यामुळे दोन देशांंतील वाढता तणाव थांबवला गेला होता.