शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या इयत्तेपासूनच गीता शिकवायला हवी

By admin | Updated: August 3, 2014 02:11 IST

मी देशाचा हुकूमशहा असतो तर इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातच भगवद्गीता आणि महाभारत यांचा समावेश केला असता, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ अनिलआऱ दवे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

अहमदाबाद : मी देशाचा हुकूमशहा असतो तर इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातच भगवद्गीता आणि महाभारत यांचा समावेश केला असता, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ अनिलआऱ दवे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
न्या. दवे म्हणाले की, तथाकथित धर्मनिरपेक्षवादी माङयाशी सहमत होणार नाहीत..यावरून मला कोणी धर्म निरपेक्ष म्हटले वा ना म्हटले तर त्याबद्दल मी दिलगिर आहे.मी भारताचा हुकूमशहा असतो तर पहिल्या वर्गापासून मुलांना गीता आणि महाभारत शिकवले असत़े याच माध्यमातून तुम्ही जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान शिकू शकता. काही चांगले आत्मसात करायचे असेल तर ते कुठूनही मिळाले तरी त्याचा स्वीकार करायला हवा.
‘जागतिकीकरणाच्या युगात समकालीन मुद्दे व मानवाधिकारांची आव्हाने’ या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत न्या़ दवे बोलत होत़े गुजरात लॉ सोसायटीने या परिषदेचे अयोजन केले होत़े
आज अनेक देशात दहशतवाद फोफावला आह़े अनेक देश लोकशाहीवादी आहेत़ लोकशाहीवादी देशातील प्रत्येक जण सुजाण असेल तर साहजिकच ते अशाच नीतिमान व सज्जन व्यक्तींना निवडून देतील़ अशा नीतिमान व सज्जन व्यक्ती कधीच कुणाचे 
अहित चिंतू शकल्या नसत्या, असे ते म्हणाले.
अशा प्रकारे प्रत्येकामध्ये जे काही चांगले आहे त्याचे पोषण करून आपण सर्वत्र पसरत असलेला हिंसाचार थांबवू शकू. पण त्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या भूतकाळात जाऊन मार्ग शोधावे लागतील, असे त्यांचे प्रतिपादन होते. याच परिषदेत बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा म्हणाले की, ‘सर्वासाठी विकास’ हा जागतिकीरणामागचा मूळ गाभा असायला हवा. जागतिकीकरणाचे लाभ आपण सर्वार्पयत पोहोचवू शकलो नाही तर त्यातून भविष्यात मोठी आव्हाने उभी राहतील, असे त्यांचे म्हणणो होते. (वृत्तसंस्था)
 
च्भारताने आपल्या प्राचीन परंपरा, संस्कृती आणि सभ्यतेकडे परतायला हवे आणि यासाठी लहान वयात मुलांना महाभारत, भगवद्गीता शिकावयाला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडल़े 
च्यावेळी ते म्हणाले की, गुरू-शिष्य परंपरेसारख्या आपल्या अनेक महान परंपरा कालौघात नष्ट झाल्या आहेत़ या परंपरा जपल्या गेल्या असत्या तर देशात हिंसाचार, दहशतवादासारख्या समस्या दिसल्या नसत्या़