शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चकमकीत चार अतिरेकी ठार, अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादलाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:31 IST

अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले.

श्रीनगर : काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चार अतिरेक्यांना ठार मारले. पोलिसांनी ही माहिती दिली.अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले. दक्षिण काश्मीरच्या दियालगाम भागात ही चकमक घडली.दुसऱ्या घटनेत कठुआ जिल्ह्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय सीमेवर चौक्यांवर रात्रभर हा गोळीबार सुरू होता. यात भारताच्या बाजूने कोणतीही हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएसएफने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तरदिले. (वृत्तसंस्था)हिरानगर सेक्टरच्या मन्यारी- चोरगली भागांत दोन्ही बाजूंनी रात्रभर गोळीबार झाला. रविवारी सकाळी ४.३० वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू होता.अतिरेक्याला अटककाश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका अतिरेक्याला पकडण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, दानिश ककरू, असे या अतिरेक्याचे नाव आहे.तो बारामुल्लाच्या चिश्ती कॉलनीतील रहिवासी आहे. अन्य एका घटनेत कुलगाम जिल्ह्यात बाजारपेठेत दोन लोकांना पकडण्यात आले आहे. यातील एकाचे नाव परवेज अहमद मंटू आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी