Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:57 IST2025-06-18T09:56:13+5:302025-06-18T09:57:37+5:30

Air India Plane Crash Reason: माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. विमान अपघाताच्या कारणाबद्दल केलेल्या व्हिडीओत त्यांनी शंका मांडल्या.  

Former pilot Gaurav Taneja raised two doubts that the Air India plane may have crashed due to excess weight. | Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट

Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट

Air India Plane Crash Update : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचेविमान पडले. विमानाचाअपघात का झाला, याबद्दल वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजाने यांनी अपघाताबद्दल दोन मुद्दे मांडले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गौरव तनेजा हे एअर एशियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होते. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ते कॅप्टन होते. नवीन व्हिडीओमध्ये गौरव तनेजांनी फ्लाईटरडार अॅपच्या ताज्या माहितीचा हवाला दिला आहे. हे अॅपच्या मदतीने लोक हवाई वाहतुकीबद्दल माहिती मिळवू शकतात. 

वाचा >>विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO

विमानाला टेकऑफ जास्त वेळ लागला

गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाचा धावपट्टीवरून जातानाचा व्हिडीओ दाखवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, विमान उड्डाण करताना धावपट्टीवर धूळ उडताना दिसत आहे. यातून असे दिसते की विमानाने पक्क्या धावपट्टीवरून नाही, तर कच्च्या किंवा धूळ असलेल्या धावपट्टीवरून उड्डाण केले. विमानाने धावपट्टी शेवटच्या टोकावरून टेकऑफ केले आणि ही बाब सामान्य मानली जात नाही.

ओव्हरलोडिंगमुळे विमान उड्डाण करू शकले नाही?

गौरव तनेजांनी म्हटले आहे की, या विमानाला जास्त वेळ धावपट्टीवरून जावं लागलं आणि टेकऑफ केल्यानंतर लगेच वेग कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विमानामध्ये काहीतरी गडबड होती. मग लोडिंगमध्ये काही अडचणी होत्या का? कारण असे अपघात यापूर्वीही झाले आहेत. १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच अपघात झाला होता, त्याचं कारण ओव्हरलोडिंग होतं.

जास्त नफा कमावण्यासाठी 

गौरव तनेजा म्हणाले की, 'अनेकदा विमान कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी विमानात जास्त सामान लादतात. सामान कागदोपत्री कमी दाखवले जाते, पण प्रत्यक्षात विमानात वजन जास्त असते. यावेळीही असेच काही झाले होते का? इस्रायलच्या तेल अवीवमध्ये सामानाचे वजन चुकीचे सांगितले गेले होते आणि अपघात झाला होता', असेही ते म्हणाले. 

Web Title: Former pilot Gaurav Taneja raised two doubts that the Air India plane may have crashed due to excess weight.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.