शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' समितीत सगळेच सरकारधार्जिणे, आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा

By कुणाल गवाणकर | Updated: January 12, 2021 18:45 IST

कोर्टानं स्थापन केलेल्या समितीसमोर जाणार नाही; शेतकरी नेत्यांची भूमिका

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी न्यायालयानं ४ तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली असून त्यांना २ महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका बाजूला न्यायालयीन घडामोडी सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे हा तिढा कायम राहणार असल्याचं दिसत आहे.सर्वोच्च न्यायालयानं तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देत चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्यावर शेतकरी नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'सर्वोच्च न्यायालय मध्यस्थीसाठी स्थापन करत असलेली कोणतीही समिती आम्हाला मान्य नसेल ही बाब आम्ही काल रात्रीच एका प्रेस नोटमधून स्पष्ट केली होती. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करून घेणार आणि स्वत:च्या खांद्यावरील ओझं दूर करणार, याची आम्हाला कल्पना होती,' असं क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले.आम्ही कोणत्याही समितीसमोर जाणार नसल्याचं आम्ही कालच स्पष्ट केलं असल्याचं भारतीय किसान युनियनच्या बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितलं. 'आमचं आंदोलन सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीमधील सगळे सदस्य सरकारधार्जिणे आहेत. त्यांनी आधीपासूनच सरकारनं आणलेल्या कायद्यांची भलामण केली आहे,' असं राजेवाल यांनी म्हटलं.भारतीय किसान युनियनचे महासचिव राकेश टिकेत यांनीदेखील शेतकरी त्यांच्या मागण्यांपासून मागे हटणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. 'कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. कायदे माघारी घेतले गेल्यावरच आम्ही माघारी जाऊ. आम्ही न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करू. आमच्या विधीतज्ज्ञांशी चर्चा करू. त्यानंतर कोअर टीमची बैठक होईल. त्यात पुढील रणनीती निश्चित केली जाईल,' असं टिकेत यांनी सांगितलं.

टॅग्स :FarmerशेतकरीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय