शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

'त्या' समितीत सगळेच सरकारधार्जिणे, आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा

By कुणाल गवाणकर | Published: January 12, 2021 6:38 PM

कोर्टानं स्थापन केलेल्या समितीसमोर जाणार नाही; शेतकरी नेत्यांची भूमिका

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी न्यायालयानं ४ तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली असून त्यांना २ महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका बाजूला न्यायालयीन घडामोडी सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे हा तिढा कायम राहणार असल्याचं दिसत आहे.सर्वोच्च न्यायालयानं तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देत चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्यावर शेतकरी नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'सर्वोच्च न्यायालय मध्यस्थीसाठी स्थापन करत असलेली कोणतीही समिती आम्हाला मान्य नसेल ही बाब आम्ही काल रात्रीच एका प्रेस नोटमधून स्पष्ट केली होती. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करून घेणार आणि स्वत:च्या खांद्यावरील ओझं दूर करणार, याची आम्हाला कल्पना होती,' असं क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले.आम्ही कोणत्याही समितीसमोर जाणार नसल्याचं आम्ही कालच स्पष्ट केलं असल्याचं भारतीय किसान युनियनच्या बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितलं. 'आमचं आंदोलन सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीमधील सगळे सदस्य सरकारधार्जिणे आहेत. त्यांनी आधीपासूनच सरकारनं आणलेल्या कायद्यांची भलामण केली आहे,' असं राजेवाल यांनी म्हटलं.भारतीय किसान युनियनचे महासचिव राकेश टिकेत यांनीदेखील शेतकरी त्यांच्या मागण्यांपासून मागे हटणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. 'कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. कायदे माघारी घेतले गेल्यावरच आम्ही माघारी जाऊ. आम्ही न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करू. आमच्या विधीतज्ज्ञांशी चर्चा करू. त्यानंतर कोअर टीमची बैठक होईल. त्यात पुढील रणनीती निश्चित केली जाईल,' असं टिकेत यांनी सांगितलं.

टॅग्स :FarmerशेतकरीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय