शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, १ एप्रिलपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 10:58 IST

यासंदर्भातील नवीन प्रवास नियम येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

नवी दिल्ली: भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांनी आगमनापूर्वी ७२ तासांच्या आत डिजिटल ई-अरायव्हल कार्ड सबमिट करणे अनिवार्य आहे. हे अधिकृत अॅप्स किंवा संकेतस्थळांद्वारे केले जाऊ शकते. यासंदर्भातील नवीन प्रवास नियम येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

विदेशी प्रवासी दुसऱ्या देशात आगमनापूर्वी विमानात, विमानतळावर कागदी अर्ज भरत असत. आता त्याची जागा ई-अरायव्हल कार्ड या सुलभरीत्या भरता येईल अशा ऑनलाइन अर्जाने घेतली आहे. त्यामुळे भारतात प्रवेश करण्याची प्रक्रिया जलद होते आणि प्रतीक्षा वेळ कमी होतो.

योजना भारत का राबवणार आहे?

सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएईमध्ये ई-अरायव्हल कार्डची योजना आहे. परदेशी प्रवासी भारतात आल्यानंतर त्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदी फॉर्म भरावे लागत. त्यात काही समस्या उद्भवत होत्या. हा फॉर्म ऑनलाइन भरता येत असल्याने बनावट नोंदींना रोखता येते. म्हणून भारतही ही योजना राबविणार आहे.

विसरल्यास, टाळल्यास काय होईल ? ई-अरायव्हल कार्ड भरणे विसरलात किंवा टाळलेत तरी तुम्ही भारतात प्रवेश करू शकता. त्यासाठी बंदी किंवा दंड नाही. पण, अतिरिक्त तपासणीसाठी इमिग्रेशन तुम्हाला बाजूला घेईल, रांगा लांबतील आणि प्रवास ताणतणावयुक्त होईल.

कोणती माहिती आवश्यक आहे? 

पासपोर्टचा क्रमांक, पासपोर्ट जारी केल्याची व तो संपुष्टात येणार असल्याची तारीख येणार

विमानाचा तपशील : क्रमांक, आगमन तारीख, विमानतळ प्रवाशाचा फोन नंबर आणि ईमेल भेटीचे कारण (पर्यटन, काम, अभ्यास) भारतातील निवासस्थान (हॉटेलचे नाव व पत्ता)

अर्ज कुठे भरता येईल ? हा अर्ज भरण्यासाठी तीन अधिकृत मार्ग आहेत. ही मोफत सेवा आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनचे संकेतस्थळ : boi.gov.in इंडियन व्हिसा ऑनलाइन पोर्टल : indianvisaonline.gov.in Su-Swagatam अॅप

ई-अरायव्हल कार्ड म्हणजे काय? 

डिजिटल ई-अरायव्हल कार्डसाठी ऑनलाइन अर्ज फोन किंवा संगणकाद्वारे भरता येईल. विमानाच्या आगमनापूर्वी ७२ तासांच्या आत हा अर्ज भरून सादर करा. त्यानंतर संबंधित प्रवाशाला क्यूआर कोड मिळतो. भारतात विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना हा कोड दाखवा, ते तो स्कॅन करतील भारतात प्रवेशाची प्रक्रिया लवकर पार पडेल.

कोणत्या प्रवाशांनी हे अर्ज भरायचे

भारतीय नागरिकांना डिजिटल ई-अरायव्हल कार्डसाठी अर्ज भरायची गरज नाही. परदेशी प्रवासी आणि ओव्हरसीज सिटिझनच दर्जा असलेल्यांना हा अर्ज करावा लागेल. या पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक हे प्रवासी समाविष्ट आहेत. एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांची नावे एका अर्जात नमूद करता येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : E-Arrival Card Mandatory for Foreign Travelers to India from April 1

Web Summary : Foreign travelers to India must submit a digital E-Arrival Card within 72 hours before arrival starting April 1. This speeds up immigration. It's not mandatory, but recommended to avoid delays. Apply via boi.gov.in, indianvisaonline.gov.in, or Su-Swagatam app. Indian citizens are exempt.
टॅग्स :Airportविमानतळ