शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील दुष्काळ राज्यसभेत

By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST

शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला.

नवी दिल्ली : शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला. मराठवाडय़ासह विदर्भातील टंचाईग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. या भागांत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा यांची तीव्र टंचाई आहे. दुष्काळी भागात शेतक:यांच्या हाती पीकही फारसे लागणार नाही याकडे खा. धूत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 
शून्य प्रहरात हा विषय धूत यांनी उपस्थित केला. धूत यांनी सांगितले की, राज्यातील 39134 खेडय़ांपैकी 1969 खेडय़ांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. औरंगाबाद विभागातील 8 हजार, अमरावती विभागातील 7241 आणि नागपूर विभागातील 2क्29 व उर्वरित अन्य विभागातील खेडय़ांचा त्यात समावेश आहे.
 दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागांतील शेतक:यांच्या हाती पीकही नगण्य असेल म्हणून हे भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हायला हवे होते परंतु तसे झालेले नाही. या भागांना तातडीने मोठय़ा प्रमाणावर मदत हवी असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर संसाधनांची गरज असल्याचे धूत म्हणाले. 
दुष्काळग्रस्त भागांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी केंद्राकडून प्राधान्याने निधी मिळणो ही काळाची गरज आहे, असे सांगून धूत यांनी यासंदर्भात मी कृषीमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असे सांगितले.
या गंभीर विषयात तातडीने वैयक्तिक लक्ष घालून या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त ग्रामीण लोकांना व मुक्या जनावरांना मदत म्हणून महाराष्ट्राला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन राजकुमार धूत यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी केले.