शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का? ईडी चौकशीवरुन भाजपचा अरविंद केजरीवाल यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:35 IST

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलविले होते, केजरीवाल यांनी ईडीच्या नोटीसीवर उत्तर दिले आहे. यामध्ये ईडीने ही नोटीस त्वरीत मागे घ्यावी, असे म्हटले आहे. तसेच केजरीवाल ईडीच्या चौकशीला जाणार नसून ते मध्य प्रदेशच्या सिंगरौलीमध्ये निवडणूक प्रचाराला जाणार आहेत, यावरुन आता भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निशाणा साधला आहे. 

केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती

भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी ईडीसमोर हजर न झाल्याचा खरपूस समाचार घेतला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोणावर विश्वास नाही का? त्यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का?, असा सवाल त्यांनी केला.

संबित पात्रा म्हणाले, अरविंद केजरीवाल पळून गेल्याचे तुम्ही टीव्हीवरून पाहत असाल. अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सपासून पळ काढत आहेत, सत्याला सामोरे जाण्यापासून ते पळत आहेत. तपासापासून पळ काढणे म्हणजे माझ्याकडून चूक झाली हे मान्य करण्यासारखे आहे. ईडीसमोर हजर न होणे म्हणजे एक प्रकारे भीती दाखवणे, होय, माझ्याकडून चूक झाल्याचे मान्य करणे.

दिल्ली मद्य घोटाळ्याला अरविंद केजरीवाल थेट जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. संबित पात्रा म्हणाले, केजरीवाल हे या घोटाळ्याचे किंगपीन आहेत, होय, मद्य घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचे केजरीवाल यांनी मान्य केले आहे. या धोरणात झालेल्या सर्रास भ्रष्टाचारात सहभाग आहे. नाहीतर त्यांना घाबरायची काय गरज होती?

सुप्रीम कोर्टाचा उल्लेख करत भाजपने आप नेत्यांवरही निशाणा साधला. पात्रा म्हणाले, अवघ्या ३ दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन फेटाळला आणि दारू घोटाळा अनेक हजार कोटींचा असल्याचे सांगितले. पूर्वी केजरीवाल शीला दीक्षित यांनी भ्रष्टाचार केला, रॉबर्ट वाड्रा यांनी भ्रष्टाचार केला, लालूप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार केला असे रोज म्हणायचे पण आज त्यांनी या सर्वांशी युती केली आहे.

आज भारताची तपास यंत्रणा तुम्हाला समन्स बजावत असताना तुम्ही पळून जात आहात. तुम्हाला भ्रष्टाचाराचे मूळ म्हटले आहे. तुम्ही कायद्याच्या वर आहात का? असंही संबित पात्रा म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाSambit Patraसंबित पात्रा