शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे तोंडी आदेश पाळू नका!

By admin | Updated: October 24, 2014 03:38 IST

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिका-यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिकाऱ्यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असा ताजा फतवा पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) काढल्याने मंत्री आणि त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांना तोंडी हुकूम सोडून कामे करून घेण्याची सवय सोडावी लागणार आहे.‘पीएमओ’ने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या ताज्या कार्यालयीन आदेशात (ओएम) याचा समावेश असून वरिष्ठांनी तोंडी दिलेल्या आदेशाची लेखी पुष्टी केल्याशिवाय त्यानुसार पुढील पाऊल न उचलण्याचे बंधन सर्वच मंत्रालयांमधील अधिकाऱ्यांना पाळावे लागणारआहे. वरिष्ठांनी एखादी गोष्ट करण्याविषयी तोंडी सांगितले व तसे करणे नियमांत बसणारे असले तरीही त्याची लेखी पुष्टी करून घेण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेआहे.आपली मते किंवा निर्देश फाईलमध्ये लेखी न नोंदविता हवे असलेले काम तोंडी आदेश देऊन करून घेण्याची प्रवृत्ती अलीकडच्या वर्षांमध्ये मंत्र्यांमध्ये रूढ झाल्याचे दिसते. काही अधिकारी, जे काही सांगायचे ते फाईलवर लिहा, असा आग्रह धरतात; पण बऱ्याच वेळा लेखी नोंद न करताच अधिकारी मंत्र्यांच्या इच्छेनुसार कामे पार पाडतात. ‘पीएमओ’ने जारी केलेल्या या ताज्या निदेशांमुळे अशा मंत्र्यांना यापुढे अधिक सावधपणे काम करावे लागणारआहे.या संदर्भात पूर्वीपासूनच लागू असलेल्या; परंतु अभावानेच पालन केल्या जाणाऱ्या कार्यालयीन कामाच्या मॅन्युअलचा संदर्भ देत ‘पीएमओ’ने म्हटले आहे की, जेव्हा कोणाही अधिकाऱ्याला मंत्री किंवा त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांकडून तोंडी निर्देश दिले जातील तेव्हा असे निर्देश नियम वा प्रस्थापित पद्धतीला धरून असले तर संबंधित अधिकाऱ्याने, आपल्या लगेचच्या वरिष्ठाच्या ते निदर्शनास आणून द्यावेत. मात्र मंत्र्यांकडून दिलेले निर्देश नियमांत बसणारे नसतील तर तशी स्पष्ट नोंद करून संबंधित अधिकाऱ्याने ती बाब खात्याच्या सचिवाकडे न्यावी.या सर्वसाधारण नियमास अपवाद करताना मॅन्युअल म्हणते की, मंत्री आजारी किंवा दौऱ्यावर असताना एखाद्या तातडीच्या बाबीत त्यांच्याकडून फोनवरून तोेंडी निर्देश घ्यावे लागले तरी मंत्र्यांचे ते निर्देश त्यांच्या स्वीय सचिवांनी संबंधितांना लेखी कळवावे आणि मंत्री बरे झाल्यावर अथवा दौऱ्यावरून परत आल्यावर त्यांच्याकडून अशा निर्देशाची लेखी पुष्टी घेतलीजावी. (लोकमत न्यूज नेटवर्क)