शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करणार

By admin | Updated: February 14, 2015 23:38 IST

येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ग्वाही : व्हीआयपी संस्कृती संपविणारनवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली. जनसेवेसाठी २४ तास काम, व्हीआयपी संस्कृती संपविणे व दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.रामलीला मैदनावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच तेथे उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमांची एक यादीच सादर केली; सोबतच आपच्या कार्यकर्त्यांना अहंकारापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले, एखादे मोठे यश पदरी पडले की अहंकारही जागृत होण्याची शक्यता असते आणि मग सर्वकाही मातीमोल होते. त्यामुळे सर्व मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी याबाबत सतर्क राहून आपण अहंकारी तर झालो नाही ना, याचा सतत विचार केला पाहिजे. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांनी देशातील इतर राज्यात निवडणूक लढण्यावर केलेल्या विधानांचा उल्लेख केला आणि त्यांच्या या वक्तव्यांवरून अहंकार निर्माण होत असल्याचे निदर्शनास येते, असे मत मांडले. काँग्रेसला लोकांनी पराभूत केले, कारण ते अहकांरी झाले होते. भाजपाला गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. परंतु यावेळी लोकांनी त्यांना नाकारले. कारण अहकांर! म्हणूनच आम्हाला यापासून दूर राहायचे आहे, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांना सतर्क केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अण्णा आंदोलन आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा उल्लेखअण्णा आंदोलन आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा आपल्या भाषणात उल्लेख करून केजरीवाल म्हणाले, अण्णा आंदोलनादरम्यान भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा देण्यात आली होती. त्यावेळी खरंच लोकपाल विधेयक आल्यानंतरही भारत भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो काय? असा संशय मनात होता. परंतु गेल्या वेळी ४९ दिवसांचे आप सरकार स्थापन झाले तेव्हा भ्रष्टाचार संपला होता, हे आमचे कट्टर विरोधकही मानतात. यावेळीही तसेच होईल, असा विश्वास आहे.भ्रष्टाचार उघड करण्यासाठी स्टिंग आॅपरेशन करण्याचा सल्लाही त्यांनी दिल्लीकरांना दिला; तसेच भ्रष्टाचारविरोधी टेलिफोन लाईन सुरू करण्याचे आश्वासन दिले. जनलोकपाल विधेयक पारित करणे आवश्यक असून लवकरच त्या दिशेने वाटचाल सुरू करू, असे केजरीवाल यांनी सांगितले.भाजपने दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे आणि केंद्र दिलेले वचन निश्चित पाळेल, अशी खात्री दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.दिल्लीच्या विकासाचा ऊहापोह करताना भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या पराभूत उमेदवार किरण बेदी आणि काँग्रेस नेते अजय माकन यांचा विशेष नामोल्लेख करून ते म्हणाले, बेदी मला मोठ्या बहिणीसमान आहेत. त्यांचे आम्ही वेळोवेळी सहकार्य घेऊ. माकन यांना संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला लागणार आहे. एकाअर्थी विरोधकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कवी प्रदीप यांच्या ‘इन्सान से इन्सान का हो भाईचारा’ गीताने भाषणाचा समारोपदिल्लीतील चर्च आणि ईसाई समुदायाच्या संस्थांवरील हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि सर्व समुदायांनी बंधूभाव आणि सद्भावनेने राहण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे आपली ही भावना त्यांनी गाण्यातून व्यक्त केली. केजरीवाल यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप मानवता आणि बंधूभावाचा संदेश देणाऱ्या ‘पैगाम’ या चित्रपटाच्या गीताने केला. २०१३ च्या शपथविधीदरम्यानही त्यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि मन्ना डे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत गायले होते.‘इन्सान से इन्सान का हो भाईचारा, यहीं पैगाम हमारा, यहीं पैगाम हमारा’