शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

दर्डा महत्त्वाचे- सुधारित- याआधीची बातमी जोडलेली आहे. भारत अतिरेकी संघटनांच्या कायम निशाण्यावर? कटांची माहितीच नाही : गृह राज्यमंत्री चौधरी यांची विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कबुली

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली. खा. विजय दर्डा यांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता.

नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली. खा. विजय दर्डा यांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता.
3 सप्टेंबर 2014 रोजी अल-कायदाच्या शेख अयाम अल जवाहिरी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. त्यात भारतीय उपखंडात अल-कायदाची ‘एक्यूआयएस’ ही नवी शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. 29 जून 14 रोजी इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओत अबू बकर अल बगदादी याने भारतासह विविध देशांमधील मुस्लिमांची कथित दुर्दशा मांडली होती. विविध अतिरेकी संघटना भारताच्या कानाकोपर्‍यात स्फोट घडविण्याची धमकी देत आल्या आहेत. अशा संघटनांची ओळख पटवण्यात आली काय? बर्दवान स्फोटाचा गुंता सुटला आहे काय? या स्फोटांमधील दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. त्यावर चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या स्फोटाचा तपास करीत आहे. आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले, जखमी झालेले लोक जमात-उल-मुजाहिदीन बांगला देश (जेएमबी) सदस्य होते.
--------------
बँक एटीएमच्या लुटीची आकडेवारी नाही
गेल्यावर्षी देशभरातील किती बँक एटीएममध्ये लुटमारीच्या घटना घडल्या याची माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी अन्य एका उत्तरात दिली.
बँकांच्या एटीएमवर होणारी चोरी किंवा दरोड्याच्या घटनांची आकडेवारी केंद्रीय स्तरावर ठेवली जात नाही. 2012 मध्ये बँकांवर दरोड्याच्या एकूण 29 घटना घडल्या. लुटमारीचे 191 गुन्हे दाखल झाले. 2013 मध्ये दरोड्याची 28 प्रकरणे तर लुटमारीच्या 48 घटनांची नोंद झाली, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले. अलीकडेच बँक एटीएममध्ये लूट आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकारला याबाबत माहिती आहे काय? बँक एटीएम लुटण्याच्या किती घटना घडल्या याची सरकारकडे माहिती उपलब्ध आहे काय? लुटण्यात आलेल्या रकमेचा भारतविरोधी मोहिमेसाठी वापर केला जातो काय? याबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा खा. दर्डा यांनी व्यक्त केली होती.