शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Coronavirus: देशात ३० जूनपर्यंत 'लॉकडाऊन' असावे, 'या' राज्य सरकारने मांडली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 4:30 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी

कोची - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, देशातील सर्वच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनाही या परिस्थितीला कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, आता लॉकडाऊन नेमकं कधी संपणार, याचीच चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी अनेक राज्य सरकारकडून होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी आणि इतर उपाययोजना याबाबत संवाद साधला. देशातील बहुतांश राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढण्याची सूचना केल्याची माहिती आहे. देशातील परिस्थिती पाहून टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन कमी करताना देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना केरळ राज्य सरकारने मांडली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच राज्यांच्या राज्य सरकारला लॉकडाऊन संदर्भात सूचना देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, केरळ सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या सूचनेनुसार, विविध राज्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगवेगळ्या स्तरावर दिसून येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याआधारेच समितीने लॉकडाऊन संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. या समितीचे प्रमुख केरळचे माजी मुख्य सचिव आणि भारतीय सुरक्षा एक्सचेंज बोर्ड (सेबी) चे सदस्यही आहेत. या समितीने अनेक प्रकारे चाचपणी आणि संशोधन केले आहे. त्यामध्ये, आरोग्य, नागरिक, अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था याचा अभ्यास करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हवे तेवढ यश आले नसल्याने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना या समितीने मांडली आहे. त्यांसंबधी काही नियम आणि अटीही या समितीने दिल्या आहेत. 

घरातून बाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. लग्नसोहळ्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक, पण लग्नाला २५ पेक्षा जास्त लोकं नसावेत. सर्वच कामकाज कार्यालय, खासगी गाड्या आणि परिवहन मंडळाच्या वाहतूकीमध्ये एसी बंद ठेवण्यात यावे. ५ पेक्षा अधिक कोरोना संक्रमित गाव, परिसर हा हॉटस्पॉट म्हणून घोषित करावा. तसेच, या संबंधित गावांमध्ये १०० पेक्षा अधिक लोकं संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेली असावीत,हॉटस्पॉट विभागांना पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे, प्रशासनाने हा भाग सील करावा. आपात्कालीन परिस्थीत पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन मदतकार्य करावे. हॉटस्पॉट नसलेल्या भागात १५ एप्रिलनंतर तीन टप्प्यात लॉकडाऊन कमी करण्यात यावे. धार्मिक कार्यक्रम आणि आयोजित उपक्रमांना बंदी,  अंत्यसंस्काराला १० पेक्षा अधिक नागरिक असू नयेत

केरळ उच्चस्तरीय समितीने या शिफारसींसह ३० जूनपर्यंत देशात लॉकडाऊन ठेवण्याची सूचना मांडली आहे, याबाबत बीसीसी हिंदीने वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीKeralaकेरळdelhiदिल्ली