शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका, सहा प्रकारचे भत्ते कायमचे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:49 IST

लखनौ : कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. ...

ठळक मुद्देराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे 6 प्रकारचे भत्ते, सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.हे सहा प्रकारचे भत्ते बंद केल्याने सरकारची वर्षाला जवळपास 1500 कोटी रुपयांची बचत होईल.गेल्या महिन्यातच योगी सरकारने महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौ : कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता, उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणारे 6 प्रकारचे भत्ते, सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंगळवारी एक आदेशही जारी करण्यात आला. 

सरकारने आदेश जारी करत, सीसीए (city compensatory allowance), सचिवालय भत्ता, पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते, उपअभियंत्यांना मिळणारे भत्ते कायमचे बंद केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे, की सरकारने कर्मचाऱ्यांना धोका दिला आहे. हे सहा प्रकारचे भत्ते बंद केल्याने सरकारची वर्षाला जवळपास 1500 कोटी रुपयांची बचत होईल.

आणखी वाचा - CoronaVirus News: रात्री 8 वाजता बोलणार, म्हणजे मोदींचा मूड काही वेगळाच!; नेहमी याच वेळेवर केल्यात मोठ-मोठ्या घोषणा

सीसीए (city compensatory allowance) एक लाखपर्यंत अथवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना दिला जातो. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना शहरांच्या वर्गवारीनुसार, दर महिन्याला 250 ते 900 रुपयांपर्यंत हा भत्ता दिला जातो. 

सचिवालय भत्ता. हा सचिवालयात कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते विशेष सचिव स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळत होता. याची जास्तीत जास्त मर्यादा 2500 रुपये एवढी होती. सचिवालयातील कर्मचाऱ्यांशिवाय महसूल परिषदेतील अध्यक्ष आणि सदस्यांना वगळता इतर कर्मचाऱ्यांना आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील अॅडिशनल रजिस्ट्रारपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना मिळत होता.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

यापूर्वी, गेल्या महिन्यातच योगी सरकारने महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार, कर्मचारी आणि पेन्शन धारकांना डीए मळणार नाही. कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2020पासून जून 2021 पर्यंत महागाई भत्ता मिळणार नाही.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतEmployeeकर्मचारीGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार