शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 15:34 IST

मुख्यमंत्री  योगी म्हणाले, यासंदर्भात आपण उद्या अथवा परवा धर्मगुरूंशी चर्चा करणार आहोत. मानवी जीवनाला प्राधान्य दिले जाईल. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक आहे.

लखनौ - कोरोनाने संपूर्ण देशातच हाहाकार घातला आहे. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (CM Yogi) यांनी म्हटले आहे, की माणूस राहिला, तरच आस्था व्यक्त करू शकेल. मणूस आहे, म्हणून आस्था आहे. आस्थेमुळे माणूस नाही. रमजानसह इतर सनांसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणणाले, माणूस वाचला तर आस्था टिकेल. त्यामुळे कुठलेही धर्मिक स्थळ असो, तेथे पाच हून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. योगी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (UP coronavirus CM Yogi on Ramadan lockdown says do not gather more than 5 people in any religious place)

मुख्यमंत्री  योगी म्हणाले, यासंदर्भात आपण उद्या अथवा परवा धर्मगुरूंशी चर्चा करणार आहोत. मानवी जीवनाला प्राधान्य दिले जाईल. एवढेच नाही, तर कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल. कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक आहे. आम्हाला पहिल्या लाटेचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही व्यापक रणनीती तयार केली आहे. सर्व कोरोना नियमांचे पालन करून सण आणि उत्सव साजरे करा. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

लशीवरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना योगी म्हणाले, उत्तर प्रदेशात लशीची कमतरता नाही. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. उत्तर प्रदेशात 6 हजार केंद्रांतून लसीकरण सुरू आहे. लस वाया जाऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे. 

लशीच्या कमतरतेवर बोलताना योगी म्हणाले, नियोजनाच्या पातळीवर राज्य सरकारांच्या शिथीलतेमुळेच ही समस्या निर्माण झाली असेल. अन्यथा लस मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री योगी म्हणाले, लशीची नासधूस जेवढी कमी होईल तेवढीच ती अधिक लोकांना दिली जाईल, असा आमचा प्रयत्न आहे.

लॉकडाउनच्या प्रश्नावर योगी म्हणाले, राज्यात लॉकडाउनची आवश्यकता नाही. जेथे 500 हून अधिक रुग्ण आहेत अथवा जेथे रोज 100 हून अधिक रुग्ण आढळत आहेत. अशा ठिकाणी नाइट कर्फ्यू लावण्यात यावा. तसेच या काळात आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच रहावा.

Corona Updates Mumbai: मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

शाळा महाविद्यालये बंद -योगी म्हणाले, आम्ही बेसिक आणि माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये 20 एप्रिलपर्यंत बंद केली आहेत. क्लब आणि कोचिंग बंद करण्यासही सांगण्यात आले आहे. याशिवाय, बंद सभागृहांत 50 हून अधिक आणि मोकळ्या जागी 100 हून अधिक लोकांनी एकत्रित येऊ नये. तसेच सर्वांनी मास्कचा वापर करायला हवा.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस