शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीवर ७७ टक्के जनता समाधानी : सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:38 IST

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने बघता बघता २० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आपातकालीन परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारा एक सर्वे समोर आला आहे.

ठळक मुद्देया सर्व्हेत सहभागी झालेल्या ४८ टक्के लोकांनी कोरोनाविरोधात मोदी सरकारने चांगलं काम केल्याचे मत व्यक्त केले२९ टक्के लोकांनी कोरोनाला रोखण्यात खूप चांगली कामगिरी बजावल्याचे सांगितले५ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या देशातील परिस्थिती दिवसागणित चिंताजनक होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने बघता बघता २० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आपातकालीन परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारा एक सर्वे समोर आला आहे. १९ राज्यांमध्ये झालेल्या या सर्व्हेत सहभागी झालेल्या ४८ टक्के लोकांनी कोरोनाविरोधात मोदी सरकारने चांगलं काम केल्याचे मत व्यक्त केले. तर २९ टक्के लोकांनी कोरोनाला रोखण्यात खूप चांगली कामगिरी बजावल्याचे सांगितले.

आज तक-इंडिया टुडे समुहासाठी मूड ऑफ द नेशन अंतर्गत हा सर्वे कर्वी इनसाइ़ड लिमिटेडने केला. देशातील ६७ टक्के लोक कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे या सर्वेमध्ये दिसून आले. तर १८ टक्के लोकांनी कोरोनानाकाळातील मोदी सरकारची कामगिरी सरासरी असल्याचे सांगितले. उर्वरित ५ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले.

कोरोनामुळे किती नुकसान झाले याचे उत्तर देताना २२ टक्के लोकांनी व्यवसाय आणि नोकरीमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले. तर ६३ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटानंतर आपल्या आर्थिक कमाईत घट झाल्याचे सांगितले. तर १५ टक्के लोकांनी आपल्या कमाईत कोणतीही घट झाली नसल्याचे सांगितले. केवळ १ टक्का लोकांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपली कमाई वाढल्याचे सांगितले.
लॉकडाऊनमुळे लोकांचे आयुष्य वाचवता येऊ शकेल का या प्रश्नाचे उत्तर देताना ३४ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. तर ३८ टक्के लोकांनी आर्थिक अडचणी आल्याचे मान्य करत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लॉकडाऊन उपयुक्त ठरल्याचे सांगितले. तर २५ टक्के लोकांनी याबाबत नकारार्थी उत्तर दिले. ३ टक्के लोकांनी याबाबत काहीही मत व्यक्त केले नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार