शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

सदस्यांवरील निलंबन मागे घेईपर्यंत काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 6:25 AM

संसदेबाहेर ‘गांधीगिरी’ : उपसभापतींनी चहा-नाश्ता आणला; पण, निलंबित सदस्यांनी नाकारला

विकास झाडे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रविवारी राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे धरले. ज्यांच्यासमोर हा गोंधळ झाला ते उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे गांधीगिरी करीत या सदस्यांसाठी चहा-नाश्ता घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले; पण, आठही सदस्यांनी तो नाकारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नी देशभरात आंदोलन करणार आणि निलंबन मागे होईपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची घोषणा कॉँग्रेसने केली.

रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला होता. या वेळी उपसभापतींसमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन, डेरेक ओब्रायन, दोला सेन, संजय सिंह, के. के. रागेश, इल्लामारम करीम यांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर मात्र राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. हे आठही सदस्य सरकारचा निषेध करीत संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. या सर्व सदस्यांनी इथेच रात्र काढली.निलंबन मागे घेतले जात नाही तोवरकाँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कारजोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत काँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार असेल, असे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केले. त्यांनी निलंबित आठ सदस्यांची धरणे स्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.आझाद म्हणाले की, व्यापाऱ्यांनी शेतकºयांचा माल घेताना तो किमान आधारभूत मुल्यापेक्षा कमी भावात घेतला जाणार नाही अशी तरतूद या कायद्यात करण्यात यावी. देशभरात आम्ही स्वाक्षरी मोहिम राबवित आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.कॉँग्रेसचे राजीव सातव यांनी संसद परिसरातील धरणे आंदोलन थंबविण्यात आले असले तरी देशाच्या रस्त्यास्त्यावर नेऊन सरकार कसे शेतकरी विरोधी आहे ते त्यांना पटवून देऊ, हे आंदोनल आता देशव्यापी केले जाई असे त्यांनी सांगितले.रिपून बोरा यांनी उपसभापती यांनी आमच्यासाठी चहा आणून जशी सह्दयता दाखवली तशीच संसदेत चर्चा करून निलंबन मागे घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली.माफी मागा, निलंबन मागे घेऊ!निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी त्यांच्या कृतीबाबत माफी मागीतली तर त्यांच्या निलंबनाबाबत विचार केला जाऊ शकतो असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केली.हरसिमरत कौर यांचे राष्ट्रपतींना पत्रएनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणाºया हरसिमरत कौर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्विट करीत लोकसभेत आणि राज्यसभेत संमत करण्यात आलेली ही कृषि विधेयके स्वाक्षरी न करताच परत पाठवण्याची विनंती केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला कायद्याचं स्वरुप प्राप्त होईल. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस