शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यामध्ये प्रथमच फडकले चीनचे झेंडे

By admin | Updated: October 16, 2016 00:59 IST

जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी प्रथमच चीनचे झेंडे फडकवण्यात आले. काल दुपारचा नमाज आटोपल्यानंतर बारामुल्ला परिसरात आंदोलनकर्त्यांनी चीनचे झेंडे फडकवल्याचे

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी प्रथमच चीनचे झेंडे फडकवण्यात आले. काल दुपारचा नमाज आटोपल्यानंतर बारामुल्ला परिसरात आंदोलनकर्त्यांनी चीनचे झेंडे फडकवल्याचे फडकावल्याने ही बाब पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा तसेच केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात अनेकदा पाकिस्तानचे झेंडे फडकावले जातात. त्याची स्थानिक रहिवासी व पोलिसांनाही सवय झाली आहे मात्र चीनचे झेंडे प्रथमच फडकावण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनाही आश्चर्य वाटले. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराला वाटत आहे. श्रीनगरमध्ये शुक्रवारी नमाज संपल्यानंतर काही जणांनी नेहमीप्रमाणे घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी काही जणांनी चीनचा झेंडा हातात घेत, आम्हाला चीनकडून मदत हवी आहे, अशी घोषणाबाजी सुरू केली. जवळपास पाच ते सहा आंदालकांकडे चीनचे झेंडे दिसत होते. अर्थातच या आंदोलकांनी आपले चेहरे झाकून घेतले होते. पाकिस्तानचे झेंडे फडकावणारे निदर्शनही नेहमी याच पद्धतीने चेहरे झाकून घेत असतात. या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अश्रुधूराचा वापर करत निदर्शकांना पांगवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेसाठी शनिवारी गोव्यात दाखल झाले. ते भारतात येणार असतानाच, काश्मीर खेऱ्यात चीनचे झेंडे फडकावले गेल्याने यामागे चीनमधील काही गट आहेत की काय, अशी शंका घेण्यात येत आहे. मात्र हे चीनचे झेंडे पाकिस्तानमधूनच आले किंवा आणले असावेत, असे सांगण्यात येत आहे (वृत्तसंस्था)चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेसाठी येत असतानाच हा प्रकार घडला. दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहानी वणीचा खात्मा केल्यापासून काश्मीर खोरे धुमसत आहे. हिंसाचारामुळे अनेकांचा बळी गेला आहे आणि हजारो जखमी झाले आहे. या काळात अनेकदा पाकिस्तानी झेंडे फडकावण्यात आले होते. संचारबंदी उठवली; प्रीपेड मोबाइल सुरूचीनचे झेंडे फडकावल्याच्या पार्श्वभूमीवर खोऱ्यात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र तसे घडले नाही आणि रहिवाशांनीही या आंदोलकांना साथ दिली नाही. त्यामुळे श्रीनगरमधील परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी शनिवारी उठवण्यात आली. मात्र अनेक भागांमध्ये जमावबंदी लागू आहे. तीन महिन्यांपासून बंद केलेली प्रीपेड फोनची कॉल सुविधादेखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र मोबाइल इंटरनेट सेवा अद्यापही ठप्प आहे. काश्मीरममधील सामान्य जीवन विस्कळीत होऊन ९९ दिवस झाले आहेत. रविवारी १00 दिवस पूर्ण होतील.