शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दुबळ्या धोरणांमुळेच चीनची सीमेत घुसखोरी; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 6:44 AM

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सिक्कीमला खेटून असलेल्या चीन सीमेवर झालेल्या संघर्षाच्या ताज्या घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला करताना म्हटले की, सरकारच्या दुबळ्या धोरणांमुळेच चीनला भारतीय सीमेत घुसून कब्ज़ा करण्याची संधी मिळत आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही. ते किमान चीन शब्द उच्चारून सुरुवात करू शकतात.” गांधी यांची अशीही टिप्पणी होती की, सरकारचे काम होते ते चीनला सीमेवर रोखण्याचे. सत्याग्रही अन्नदात्यांना दिल्ली सीमेवर अडविण्याचे नाही. राहुल गांधी यांनी सतत चीनवरून मोदी सरकारवर हल्ले केले व चीनने भारतीय सीमेत शिरून कब्जा केल्याचे आरोप केले आहेत. सरकार मात्र ते फेटाळत आहेत. आजही सेनेकडून नाथुला सीमेवर चीन आणि भारतीय सेनेत झालेली झडप ही एक आठवड्यापूर्वीची असल्याचे सांगितले जाते. 

चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावेकाँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सल्ला दिला की, मोदी यांनी चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावे. त्यांनी मोदी यांच्यावर आरोप केला की, “देशाच्या सीमेत चिनी अतिक्रमण आणि घुसखोरीवर पंतप्रधानांच्या गूढ मौनामुळे शत्रूचा आत्मविश्वास वाढत आहे. चीनला घाबरू नका. संपूर्ण देश मजबुतीने लढेल. परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे सांगा. राष्ट्रीय सुरक्षा हा लपाछपीचा खेळ नाही. परिस्थिती गंभीर आहे.”

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारchinaचीन