शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांना बोलवा अन्यथा काम‘बंदी’!

By admin | Updated: November 18, 2016 07:11 IST

पाच वेळा तहकूब झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित झाले.

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली नोटाबंदीमुळे नऊ दिवसांपासून सामान्य जनता हैराण झाली आहे. राष्ट्राला उद्देशून ८ तारखेला ज्यांनी या निर्णयाची घोषणा केली ते (पंतप्रधान) आहेत कुठे? ते स्वत: सभागृहात येत नाहीत, आमचे म्हणणे ऐकत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज आम्ही चालू देणार नाही, असा पवित्रा काँग्रेस, तृणमूलसह तमाम विरोधी पक्षांनी घेतल्यामुळे राज्यसभेत गुरुवारी कोणतेही कामकाज झाले नाही. पाच वेळा तहकूब झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित झाले. लोकसभेतही गदारोळात पार पडलेल्या प्रश्नोत्तराच्या तासानंतर कामकाज दिवसभराकरता तहकूब झाले. राज्यसभेतही कामकाजावर नोटाबंदीने पाणी फेरले गेले.या विषयावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर द्यावे या मागणीवरून विरोधकांनी संसद बंद पाडणे म्हणजे चर्चेपासून त्यांनी पळ काढणे आहे. चर्चेला कोणी उत्तर द्यायचे, हे ठरविणे हा पूर्णपणे सरकारचा अधिकार आहे.- अरुण जेटलीनोटाबंदीमुळे सामान्य जनता किती व्यथित आहे, त्याचा सरकारला अंदाज नाही. पंतप्रधान जोपर्यंत सभागृहात विरोधकांचे याबाबत म्हणणे ऐकत नाहीत, तोपर्यंत विरोधक सभागृहाचे कामकाज चालू देणार नाहीत. - मायावती काँग्रेसने जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी, की ते सरकारच्या निर्णयाबरोबर आहेत की विरोधात? - व्यंकय्या नायडू विरोधकांची चर्चेची मागणी सरकारने मान्य केली होती; पण विरोधकांकडे ठोस मुद्दा नसल्याने त्यांनी गोंधळाचा मार्ग पत्करला. - मुख्तार अब्बास नकवी