शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

जळालेली घरे बांधली; पण मनमर्जी जगता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 06:19 IST

भेदरलेले चेहरे : उत्तर प्रदेशातील भदेठीत दलित वस्तीवर जून २०२० मध्ये झाला होता हल्ला

- धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कशाहगंज : आमची जळालेली घरे सरकारने बांधून दिली आहेत. पण आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतानाही प्रत्यक्षात दबावाखाली जगावे लागते, असं डोळ्यात डोळे घालून भदेठी येथील दलित वस्तीतल्या महिला सांगत होत्या. इतक्या दिवसांनंतरही चेहरे भेदरलेले आहेत. महिला डोळ्याला पदर लावतच बोलतात. सत्य सांगतानाही त्यांना मोठी हिंमत करावी लागते, हे त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. 

ज्यांचे घर जाळले गेले होते, ते फिरतू राम म्हणाले, शेळी चारण्यारून लहान मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्याचा जाब विचारला म्हणून वाद वाढत गेला आणि अचानक रात्री आमच्या वस्तीतील घरांना आग लावण्यात आली. बायका, पोरं घाबरून जवळच्या वस्तीवर पळून गेले. आम्ही बरेच लोक सकाळीच शेतात गेलो होतो, त्यामुळे घरी येईपर्यंत आम्हाला काहीच कळलं नाही. 

उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील भदेठी  येथे जून २०२० मध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणात मोठ्यांनी उडी घेतल्याने दलितांची घरे जाळण्यात आली होती. आज त्या गावातील पीडितांना घरे बांधून दिली आहेत, मात्र त्यांची जनावरे होरपळून मेली, ती काही परत मिळाली नाहीत.पोलिसांनी या प्रकरणात ३५ जणांना अटक केली होती. अजूनही त्याची केस सुरू आहे, पण प्रत्यक्षात आजही या गावात दोन्ही समाजांत तेढ आणि द्वेषाची भावना आहे. पीडित कुटुंबांना नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाखांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत ७ पीडित कुटुंबांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते, पण १ लाख ७४ हजार रुपये मिळाले होते. त्यात कर्ज काढून आणखी रक्कम घातली आणि घर बांधले, असे फितूर राम म्हणाले. १५ दिवस वस्तीवर भीतीचे वातावरण होते. कुणी वस्तीवर यायला तयार नव्हते. पुन्हा हल्ला झाला तर काय करायचे, असा प्रश्न होता. पण, हळूहळू भीती कमी झाल्यावर एकेक कुटुंब वस्तीवर परत आले, असे आशादेवी यांनी सांगितले.

निवडणुकीपेक्षा आम्हाला रोजीरोटीची भ्रांत     आमच्या राज्यात निवडणूक आहे. मोठमोठ्या गाड्या भुर्रर्र येतात आणि धूळ उडवून निघून जातात. आम्ही सगळ्यांनाच माना डोलवतो, पण निवडणूक येते आणि जाते.     आमच्यासमोर निवडणुकीपेक्षा रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं बारावीपर्यंत शिकलेली फितूर राम यांची सून म्हणाली आणि जमलेल्या सगळ्या महिलांनी माना डोलवून सहमती दर्शविली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश