शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळालेली घरे बांधली; पण मनमर्जी जगता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 06:19 IST

भेदरलेले चेहरे : उत्तर प्रदेशातील भदेठीत दलित वस्तीवर जून २०२० मध्ये झाला होता हल्ला

- धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कशाहगंज : आमची जळालेली घरे सरकारने बांधून दिली आहेत. पण आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतानाही प्रत्यक्षात दबावाखाली जगावे लागते, असं डोळ्यात डोळे घालून भदेठी येथील दलित वस्तीतल्या महिला सांगत होत्या. इतक्या दिवसांनंतरही चेहरे भेदरलेले आहेत. महिला डोळ्याला पदर लावतच बोलतात. सत्य सांगतानाही त्यांना मोठी हिंमत करावी लागते, हे त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. 

ज्यांचे घर जाळले गेले होते, ते फिरतू राम म्हणाले, शेळी चारण्यारून लहान मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्याचा जाब विचारला म्हणून वाद वाढत गेला आणि अचानक रात्री आमच्या वस्तीतील घरांना आग लावण्यात आली. बायका, पोरं घाबरून जवळच्या वस्तीवर पळून गेले. आम्ही बरेच लोक सकाळीच शेतात गेलो होतो, त्यामुळे घरी येईपर्यंत आम्हाला काहीच कळलं नाही. 

उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील भदेठी  येथे जून २०२० मध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणात मोठ्यांनी उडी घेतल्याने दलितांची घरे जाळण्यात आली होती. आज त्या गावातील पीडितांना घरे बांधून दिली आहेत, मात्र त्यांची जनावरे होरपळून मेली, ती काही परत मिळाली नाहीत.पोलिसांनी या प्रकरणात ३५ जणांना अटक केली होती. अजूनही त्याची केस सुरू आहे, पण प्रत्यक्षात आजही या गावात दोन्ही समाजांत तेढ आणि द्वेषाची भावना आहे. पीडित कुटुंबांना नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाखांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत ७ पीडित कुटुंबांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते, पण १ लाख ७४ हजार रुपये मिळाले होते. त्यात कर्ज काढून आणखी रक्कम घातली आणि घर बांधले, असे फितूर राम म्हणाले. १५ दिवस वस्तीवर भीतीचे वातावरण होते. कुणी वस्तीवर यायला तयार नव्हते. पुन्हा हल्ला झाला तर काय करायचे, असा प्रश्न होता. पण, हळूहळू भीती कमी झाल्यावर एकेक कुटुंब वस्तीवर परत आले, असे आशादेवी यांनी सांगितले.

निवडणुकीपेक्षा आम्हाला रोजीरोटीची भ्रांत     आमच्या राज्यात निवडणूक आहे. मोठमोठ्या गाड्या भुर्रर्र येतात आणि धूळ उडवून निघून जातात. आम्ही सगळ्यांनाच माना डोलवतो, पण निवडणूक येते आणि जाते.     आमच्यासमोर निवडणुकीपेक्षा रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं बारावीपर्यंत शिकलेली फितूर राम यांची सून म्हणाली आणि जमलेल्या सगळ्या महिलांनी माना डोलवून सहमती दर्शविली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश