शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

“मोबाईलमध्ये असे मेसेज आहेत की ते डिलीट केले नाही तर अडकेन”; भाजपा खासदाराचं संसदेत विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:10 PM

Cyber Fraud Issue Raised in Rajyasabha: त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात

ठळक मुद्देमला या प्रकराचे अनेक घटना समजल्या आहेत. जिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली गेली आहे५ लाखांची लॉटरी लागली आहे असे मेसेज सगळ्यांना येत आहेत, ५ रुपये दिले तर ५ लाखांची लॉटरी लागेलबँक कोणतीही कारवाई करत नाही, अशा प्रकरणात तातडीने कारवाई होऊन जे पीडित असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत

नवी दिल्ली – राज्यसभेत बुधवारी काही सदस्यांनी डिजिटल व्यवहार, एटीएमच्या ग्राहकांसोबत होणाऱ्या फसवणुकीबाबत आणि बँकिंग सुविधेवर मुद्दा उचलला आणि, सरकारने आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला यांनी सायबर गुन्हेगारांकडून बँक ग्राहकांना फोन करून फसवणूक केल्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केला होता. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणलं.

याबाबत उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला म्हणाले की, फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना फोन करून त्यांची फसवणूक केली जाते, त्यासाठी हे गुन्हेगार बनावट डोमेनचा वापर करतात. हे सायबर गुन्हेगार कॉल करून KYC अपडेट करण्याचं ग्राहकांना सांगतात. असं नाही केल्यास खाते बंद होण्याची धमकी देतात. त्यामुळे समोरील ग्राहक घाबरून OTP देतो. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यावरून परस्पर मोठी रक्कम लंपास करण्याचे प्रकार घडतात.

त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात. मला या प्रकराचे अनेक घटना समजल्या आहेत. जिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली गेली आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. आताही मोबाईलवर असे मेसेज आहेत, जे डिलीट केले नाही तर अडकेन असं भाजपा खासदार म्हणाले. यावर सभापती वैकय्या नायडूंनी सांगितलं की, ५ लाखांची लॉटरी लागली आहे असे मेसेज सगळ्यांना येत आहेत, ५ रुपये दिले तर ५ लाखांची लॉटरी लागेल असं ते म्हणाले.

लोकांना त्यांचे पैसे परत मिळावेत

भाजपा खासदार संसदेत म्हणाले की, बँक कोणतीही कारवाई करत नाही, अशा प्रकरणात तातडीने कारवाई होऊन जे पीडित असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत. ग्राहकांच्या मोबाईलवर अशाप्रकारे मेसेज येतात की, काही रुपये जमा करा तुम्हाला लाखो रुपये मिळतील, प्रलोभन दाखवून ग्राहकांची लूट होते असं त्यांनी सांगितले.

पिन ऐवजी ओटीपी लागू करा

भाजपाचे रामकुमार वर्मा यांनी एटीएममधून पैसे काढण्याबाबत सरकारला पिन ऐवजी ओटीपी लागू करण्याची मागणी केली, त्यामुळे एटीएममधून परस्पर पैसे काढण्याचं सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाbankबँक