शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

्रपोहायला गेलेल्या मुलाचा उरमोडी जलाशयात बुडून मृत्यू वेणेखोल येथील घटना : पाच तासांनंतर मृतदेह सापडला

By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST

परळी : गावातील मुलांबरोबर उरमोडी जलाशयात पोहायला गेलेल्या अल्पेश राजेंद्र मोरे (वय ९) या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि. ११) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

परळी : गावातील मुलांबरोबर उरमोडी जलाशयात पोहायला गेलेल्या अल्पेश राजेंद्र मोरे (वय ९) या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि. ११) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
अल्पेश आईवडीलांसोबत मुंबई (डांेबिवली) येथे वास्तव्यास आहे. त्यांचे मूळगाव सायळी आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या भावकीतील एकाचे लग्न होते. त्यासाठी सर्वजण गावी आले आहेत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर अल्पेश आईबरोबर वेणेखोल येथे राहणार्‍या मामाकडे गेला. दरम्यान, रविवारी दुपारी अल्पेश वेणेखोल गावातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळून झाल्यानंतर सर्व मुले उरमोडी जलाशयात पोहण्यासाठी उतरली. अल्पेशला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो जलाशयाच्या काठावर उभे राहून स्वत:च्या अंगावर पाणी मारत होता. तर इतर मुले जलाशयात पोहण्यात दंग झाली होती. सुमारे अर्धातास पोहून झाल्यानंतर सर्व मुले घरी निघाली. वाटेत गेल्यानंतर अल्पेश नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गावातील काही लोकांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी जलाशयाकडे धाव घेतली असता, जलाशयाच्या काठावर अल्पेशचे कपडे आणि सँडल सापडले. त्यामुळे तो जलाशयातच बुडाल्याचे निष्पन्न झाले. गावातील काही प˜ीच्या पोहण्यार्‍या युवकांना बोलावून अल्पेशचा शोध घेण्यात आला. रात्री आठच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला.
अल्पेशचा जलाशयात बुडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या आईवडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. डोंबिवली येथे अल्पेश चौथीत शिकत होता. त्याला सात वर्षांचा लहान भाऊ आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)
- अधिक वृत्त हॅलो १ वर