शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

अरविंद केजरीवाल यांना डांबल्याबद्दल भाजपने देशाची माफी मागावी; ‘आप’ने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 08:53 IST

सीबीआय-ईडी केंद्राचे ‘तोता-मैना’ असल्याची टीका

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या अत्यंत प्रामाणिक नेत्याला तुरुंगात डांबल्याबद्दल भाजपने देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आम आदमी पक्षाने (आप) शुक्रवारी केली. मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यामुळे भाजपचा खोटारडेपणा, तसेच सीबीआय-ईडी हे केंद्र सरकारचे तोता-मैना असल्याचे उघड झाले असल्याचेही आपने सांगितले.

हरयाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका लवकरच होणार असून, त्याच्या आधी केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने आपला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दिल्लीतील आपच्या मुख्यालयामध्ये जल्लोष सुरू होता. कार्यकर्त्यांनी मिठाई वाटली व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. केजरीवाल यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनिता यांनी आपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात  केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. 

१० वर्षांत यंत्रणांचा गैरवापर : काँग्रेस 

गेल्या १० वर्षांत राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर खाते या यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, तपास यंत्रणांचा भाजपने गैरवापर करूनही जनतेने त्या पक्षाला प्रत्युत्तर दिले. भाजपला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. गेली दहा वर्षे सत्तेवर असलेल्या सरकारच्या कार्यकाळात अनेक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्यावर अद्याप खटलेही सुरू झालेले नाहीत. अशा लोकांचीही न्यायालयाने स्वत:हून दखल घेणे आवश्यक आहे, असे श्रीनेत म्हणाल्या.

देशातील लोकशाहीचा पाया अजूनही मजबूत

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन या घटनेमुळे देशातील लोकशाहीचा पाया मजबूत असल्याचे सिद्ध झाले. केजरीवाल यांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यात अखेर सत्याचा विजय झाला. बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून एखाद्याला पराभूत करण्याचे कारस्थान या लोकशाही देशात कधीही यशस्वी होणार नाही, हे केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनाच्या घटनेतून दिसून आले, असेही शरद पवार म्हणाले. 

मुख्यमंत्रिपद सोडा : भाजप

अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने फक्त सशर्त जामीन मंजूर केला आहे. ते अजूनही मद्य धोरणाशी निगडीत प्रकरणात आरोपी आहेत, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले की, केजरीवाल यांनी तत्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

अटक ते जामीन...

नोव्हेंबर २०२२ - दिल्ली सरकारने नवे मद्य धोरण जाहीर केलेजुलै २०२२ - मद्य धोरणाबाबतच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी शिफारस नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केली.ऑगस्ट २०२२ - सीबीआय व ईडीने मद्य धोरणाबाबत गुन्हे नोंदविले.२१ मार्च २०२४ - ईडीने केजरीवाल यांना अटक केली.२६ जून २०२४ - सीबीआयने केजरीवाल यांना मद्य धोरणप्रकरणी तुरुंगात अटक.  १७ जुलै २०२४ - सीबीआयने केलेल्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान. १२ ऑगस्ट २०२४ - सीबीआयने केलेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.१३ सप्टेंबर २०२४ - केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपाcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार