शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

"राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"; भाजपाचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:23 AM

BJP Akshaywar Lal Gond And Rakesh Tikait : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. किसान महापंचायतीनंतर, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. वादग्रस्त विधानं करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बहराईचचे भाजपा खासदार अक्षयवर लाल गोंड ( BJP Akshaywar Lal Gond) यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना "दरोडेखोर’" म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

योगी सरकारला साडे चार वर्षे झाली म्हणून बहराईचमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा खासदार अक्षयवर लाल गोंड यांनी राकेश टिकैत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "राकेश टिकैत हे दरोडेखोर, शेतकरी आंदोलकांना परदेशातून पैसा मिळतो" असं म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलकांना पाकिस्तान, खलिस्तानवादी ठरवले. इतर देशांतून मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी पैसा पुरवला जात असल्याचाही दावा गोंड यांनी केला. आंदोलनात शेतकरी नसून राजकीय पक्षाचे लोक सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन केले असते तर, फळ-भाज्या, दूध, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असता असं अक्षयवर लाल गोंड यांनी म्हटलं आहे. 

"शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा"

काही दिवसांपूर्वी भाजपाने मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' नाही तर 'निवडणूक सभा' होत असल्याचं म्हटलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देखील भाजपाने केला होता. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' आयोजित केली होती. यामध्ये उत्तर प्रदेश आणि शेजारी राज्यांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. भाजपाने यावरून जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला होता. "शेतकऱ्यांची चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा" असल्याचं म्हटलं होतं.

 "उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

भाजपाचे किसान मोर्चाचे प्रमुख आणि खासदार राजकुमार चाहर यांनी 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा आहे. त्यांना शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही. ही 'किसान महापंचायत' नाही, तर राजकीय निवडणूक बैठक होती. विरोधी पक्ष आणि किसान संघटना राजकारणासाठी शेतकऱ्यांचा दुरुपयोग करत आहेत असं म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत जे काम शेतकऱ्यांसाठी केले आहे तितके काम कुठल्याच सरकारने केलेलं नाही असा दावा देखील चाहर यांनी केला. केंद्र सरकारच्या नव्या कृषा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक संघटना गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीMONEYपैसाPoliticsराजकारणIndiaभारत