शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

'सीएनपी' वाल्यांना जीडीपीचा अर्थ कधीच समजणार नाही, राहुल गांधींना भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:49 IST

नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच अस्वस्थ दिसून आले आहेत. आजही राहुल गांधी नोटाबंदीमुळे अस्वस्थच होते. साहजिकच, नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने खूप पैसा गमावला असेल, असेही संबित पात्रा म्हणाले.

नवी दिल्ली - जीडीपीमध्ये जोरदार वाढ झाल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. जीडीपी वाढण्याचा अर्थ सांगत ते म्हणाले, याचा अर्थ गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढणे असा आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही त्यांना टोला लगावला आहे. पात्रा यांनी काँग्रेसवर 'सीएनपी'चा आरोप केला आहे.

पात्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी भ्रमित करण्यासाठी जीडीपीचा व्याख्येचा अपभ्रंश करून ती देशासमोर ठेवली आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा विचार करता, 'सीएनपी अर्थात करप्शन, नेपोटिझम आणि पॉलिसी पॅरालिसिस वाल्या लोकांना जीडीपीचा खरा अर्थ कधीही समजू शकत नाही.

कोरोना संकटात मोठा दिलासा; २ दिवसांत मोदी सरकारसाठी ४ गुडन्यूज

पात्रा म्हणाले, काल ऐतिहासिक बातमी आली होती. आर्थिक वर्ष 2021-22 साठी, जीडीपीच्या पहिल्या तिमाहीतील विकास दराचा आकडा समोर आला. तो अभूतपूर्व 20.1 टक्क्यांवर पोहोचला. तो महामारी पूर्वच्या स्थितीत जसा होता तसा झाला. हे केवळ पीएम मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली असलेल्या याच सरकारमुळे शक्य झाले.

नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच अस्वस्थ दिसून आले आहेत. आजही राहुल गांधी नोटाबंदीमुळे अस्वस्थच होते. साहजिकच, नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने खूप पैसा गमावला असेल, असेही संबित पात्रा म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते, राहुल गांधी -राहुल गांधी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमके कोणत्या GDP संदर्भात बोलत आहेत, हे मला नंतर समजले. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केला आहे." 

खूशखबर! Retirement चं वय अन् Pension ची रक्कम वाढण्याची शक्यता;  मोदी सरकारनं तयार केली खास योजना!मोदी सरकारने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमाने तब्बल २३ लाख कोटी कमावले -"मोदी सरकारने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमाने तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?", असा सवालही राहुल गांधी यांनी सरकारला विचारला. देशात डिमॉनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचे मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचे डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असा टोलाही राहुल यांनी यावेळी लगावला होता. 

 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस