शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?; भाजपचा पलटवार

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 18:33 IST

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे. 

ठळक मुद्देराहुल गांधींना कृषी कायदे माहिती नाहीत - संबित पात्राराहुल गांधींच्या टीकेवर भाजपचा पलटवारभाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे. 

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हिंसाचार पसरवणाऱ्यांना सोडून द्यायची मागणी करत आहेत. हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती राहुल गांधी यांचे नातलग आहेत का, रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का, अशी विचारणा संबित पात्रा यांनी केली. 

राहुल गांधी यांच्याकडून दिशाभूल 

राहुल गांधी हे दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी आणि काँग्रेस आपल्या राजकारण करत आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून सामान्यांना चिथावण्याचे, भडकवण्याचे काम केले जात आहे, असा दावा संबित पात्रा यांनी यावेळी बोलताना केला. 

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

राहुल गांधींना कृषी कायदे माहिती नाहीत

राहुल गांधी आमि रिहाना या दोघांनाही कृषी कायद्यांबाबत अजिबात माहिती नाही. दोघांनाही रब्बी पीकांबद्दल माहिती नाही. तरीही कृषी कायद्यासंदर्भात वाटेल तशी विधाने करत आहेत. कॅलिफोर्निया येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. तेव्हा यापैकी कुणीही एकही ट्विट केले नाही, अशी टीका संबित पात्रा यांनी केली. 

आमचा चर्चांवर विश्वास

राहुल गांधींनी सांगितले की कोणी मागे हटणार नाही. आमचा चर्चांवर विश्वास आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे आणि आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात अजूनही चर्चा होऊ शकते, असे संबित पात्रा यांनी सांगितले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी तयार करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांना घाबरतात का? शेतकरी ही देशाची ताकद आहे. केंद्र सरकारचे काम शेतकऱ्यांशी चर्चा करणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचे निराकरण केले गेलं पाहिजे. मी  शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारचा मागे हटावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरीagitationआंदोलन