शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?; भाजपचा पलटवार

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 18:33 IST

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे. 

ठळक मुद्देराहुल गांधींना कृषी कायदे माहिती नाहीत - संबित पात्राराहुल गांधींच्या टीकेवर भाजपचा पलटवारभाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे. 

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हिंसाचार पसरवणाऱ्यांना सोडून द्यायची मागणी करत आहेत. हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती राहुल गांधी यांचे नातलग आहेत का, रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का, अशी विचारणा संबित पात्रा यांनी केली. 

राहुल गांधी यांच्याकडून दिशाभूल 

राहुल गांधी हे दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी आणि काँग्रेस आपल्या राजकारण करत आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून सामान्यांना चिथावण्याचे, भडकवण्याचे काम केले जात आहे, असा दावा संबित पात्रा यांनी यावेळी बोलताना केला. 

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

राहुल गांधींना कृषी कायदे माहिती नाहीत

राहुल गांधी आमि रिहाना या दोघांनाही कृषी कायद्यांबाबत अजिबात माहिती नाही. दोघांनाही रब्बी पीकांबद्दल माहिती नाही. तरीही कृषी कायद्यासंदर्भात वाटेल तशी विधाने करत आहेत. कॅलिफोर्निया येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. तेव्हा यापैकी कुणीही एकही ट्विट केले नाही, अशी टीका संबित पात्रा यांनी केली. 

आमचा चर्चांवर विश्वास

राहुल गांधींनी सांगितले की कोणी मागे हटणार नाही. आमचा चर्चांवर विश्वास आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे आणि आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात अजूनही चर्चा होऊ शकते, असे संबित पात्रा यांनी सांगितले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी तयार करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांना घाबरतात का? शेतकरी ही देशाची ताकद आहे. केंद्र सरकारचे काम शेतकऱ्यांशी चर्चा करणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचे निराकरण केले गेलं पाहिजे. मी  शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारचा मागे हटावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरीagitationआंदोलन