शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

2024 मध्येही भाजप सत्तेत असणार का? शशी थरूर यांनी मोठ्या विजयाचे केले भाकीत,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 09:43 IST

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भारतीय जनता पक्षही संघटनेपासून सरकारपर्यंत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी 2024 मध्ये फक्त भाजपचेच सरकार स्थापन होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2019 च्या तुलनेत जागा जिंकणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला.  या तुलनेत भाजपच्या 50 जागा कमी होऊ शकतात, असंही थरुर म्हणाले.

शशी थरूर यांच्या दाव्यानुसार,2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील. एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी अवघड काम असणार नाही. 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला केवळ 272 जागांची गरज आहे.

काल खासदार शशी थरुर यांनी अनंतपुरम येथे एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. '2019 मध्ये भाजपने चांगली कामगिरी केली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. पश्चिम बंगाललाही 18 जागा मिळाल्या. आता त्या सर्व निकालांची प्रतिकृती करणे अशक्य आहे. 2024 मध्ये बहुमतापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, असंही थरुर म्हणाले. 

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याचा संदर्भ देत शशी थरूर म्हणाले की, शेवटच्या क्षणी सरकारच्या बाजूने जबरदस्त लाट आली होती. 2024 मध्ये त्याची पुनरावृत्ती होणे शक्य नाही. विरोधी पक्षांना संधी मिळू शकते.

"जर भाजप 250 जागांवर थांबला, तर इतरांना 290 जागा मिळतील. भाजप वगळता इतर पक्ष 290 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील की नाही हे आम्हाला माहित नाही." 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 303 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त 52 जागा जिंकता आल्या, असंही शशी थरुर म्हणाले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा