शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

2024 मध्येही भाजप सत्तेत असणार का? शशी थरूर यांनी मोठ्या विजयाचे केले भाकीत,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 09:43 IST

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भारतीय जनता पक्षही संघटनेपासून सरकारपर्यंत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी 2024 मध्ये फक्त भाजपचेच सरकार स्थापन होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2019 च्या तुलनेत जागा जिंकणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला.  या तुलनेत भाजपच्या 50 जागा कमी होऊ शकतात, असंही थरुर म्हणाले.

शशी थरूर यांच्या दाव्यानुसार,2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील. एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी अवघड काम असणार नाही. 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला केवळ 272 जागांची गरज आहे.

काल खासदार शशी थरुर यांनी अनंतपुरम येथे एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. '2019 मध्ये भाजपने चांगली कामगिरी केली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. पश्चिम बंगाललाही 18 जागा मिळाल्या. आता त्या सर्व निकालांची प्रतिकृती करणे अशक्य आहे. 2024 मध्ये बहुमतापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, असंही थरुर म्हणाले. 

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याचा संदर्भ देत शशी थरूर म्हणाले की, शेवटच्या क्षणी सरकारच्या बाजूने जबरदस्त लाट आली होती. 2024 मध्ये त्याची पुनरावृत्ती होणे शक्य नाही. विरोधी पक्षांना संधी मिळू शकते.

"जर भाजप 250 जागांवर थांबला, तर इतरांना 290 जागा मिळतील. भाजप वगळता इतर पक्ष 290 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील की नाही हे आम्हाला माहित नाही." 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 303 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त 52 जागा जिंकता आल्या, असंही शशी थरुर म्हणाले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा